You are currently viewing दिशा सालीयन, डॉ. पाटकर या महिलांना न्याय देण्यासाठी ठाकरे सेना, काँग्रेस ने पुढे यावे; आमदार नितेश राणे

दिशा सालीयन, डॉ. पाटकर या महिलांना न्याय देण्यासाठी ठाकरे सेना, काँग्रेस ने पुढे यावे; आमदार नितेश राणे

*सर्वच महीलांबध्दल एकच भूमिका घ्या

*राजस्थान येथे दोन महिलांवर बलात्कार करून ६ महिन्याच्या मुलाला जाळून मारले त्यांना न्याय द्या

*आमदार नितेश राणे यांनी निगेटिव पसरविण्याऱ्यांचा घेतला समाचार

कणकवली

सर्वच महीलांबध्दल एकच भूमिका असली पाहिजे. मणिपूर बद्दल एकायचे असेल तर, दिशा सालीयन आणि डॉ. पाटकर यांच्या बद्दल उद्धव ठाकरे यांच्या मनात काय आहे ते सुद्धा आम्हाला एकेचे आहे. असे सांगताना काँग्रेसच्या महिला आमदारांनी विधिमंडळाबाहेर मणिपुरातील घटनेचा जसा निषेध केला आणि न्यायची मागणी केली त्याचप्रमाणे जोदतपुर ,रामनगर, राजस्थान येथे दोन महिलांवर बलात्कार करून ६ महिन्याच्या मुलाला जाळून मारले त्याही घटनेचा निषेध करा आणि या प्रकरणात काँग्रेसचे मुख्यमंत्री यांनी काय कारवाई केली व राहुल गांधी, सोनिया गांधी, प्रियंका गांधी यांच्या भूमिका काय आहेत हे जाहीर करा. मोदी सरकारआणि भाजप विरोधात निगेटिव पसरविण्याचे काम विरोधकांनी बंद करावे असा इशारा आमदार नितेश राणे यांनी दिला.
स्वतःला महिलांचे कैवारी समजतात ते ठाकरे सेनेतील शक्ती कपूर च्या भूमिकेतील संजय राऊत आणि त्यांच्या मालकाचा मुलगा महिला हक्का वर बोलतो तेव्हा या लोकांनी ज्याज्या महिलांना त्रास दिला त्या महिलांना हे पाहून त्रास होत असेल. जे काँग्रेस चे महिला आमदार मोदी विरोधात बोलत आहेत दिशा सालियान,डॉ. पाटणकर,यांना न्याय देण्यासाठी विरोधीपक्षाचे महिला आमदार पुढे येतील काय ? राऊत यांनी महिला डॉ. पटकर यांना शिवीगाळ केली. जोदतपुर रामनगर राजस्थान येथे दोन महिला वर बलात्कार करून ६ महिन्याच्या मुलाला जाळून मारले. त्याबद्दल कोंग्रस चा मुख्यमंत्री कारवाई करनार काय ? राहुल गांधी,प्रियांका,सोनियाजी गांधी सहवेदना व्यक्त करणार काय ? की फक्त मोदी सरकार आणि भाजप विरोधात झुटा निरेटिव पसरवत राहतील असा सवाल भाजपा नेते आमदार नितेश राणे यांनी केला.
पंतप्रधान मोदी साहेब यांनी मणिपूर घटने संदर्भात खूप कडक भूमिका घेतली आहे. जे व्हिडिओत राक्षस दिसत आहेत त्यांची गय केली जाणार नाही.असे सांगितले आहे.मात्र
जोधपूर राजस्थान मध्ये जी घरणा झाली. यात एक ६ महिन्याच मुल जाळल,दोन महिलांची बलात्कार करून हत्या केली. त्यावर सुद्धा काँग्रेस आणि ऊबाठा सेनेने बोलले पाहिजे.
काँग्रेस च्या महिला आमदार ज्या विधिमंडळाच्या बाहेर दुःख करत होते त्यांनी डॉ. पटकर याना न्यायंदेण्यासाठी बोलतील काय ? दिशा सलीयान ला न्याय मिळाला पाहिजे म्हणून मागणी करतील काय ?
कणकवली प्रहार भवन येथे पत्रकारांशी बोलतांना आमदार नितेश राणे यांनी मणिपूर येथील प्रकरणी देशाने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी निषेध केला आहे.कोणाला पाठीशी न घालता अटक केली जात आहे.मात्रा विरोधक राजकारण करून मोदींना टार्गेट करण्यासाठी देशाची बदनामी करत आहेत.अशी टीका आमदार नितेश राणे यांनी केली.
करेक्ट कार्यक्रम काय असतो हे पवार साहेबासोबत राहून संजय राऊत यांनी उद्धव ठाकरे यांचा केलेला आहे.
संजय राऊत यांनी राज्य सभेत चर्चा करायचे सोडून भांडुप मध्ये बसून बोलू नये.

प्रतिक्रिया व्यक्त करा