You are currently viewing वंचित बालकांना जीवनाच्या प्रवाहात आणू या…..

वंचित बालकांना जीवनाच्या प्रवाहात आणू या…..

*जागतिक साहित्य कला व्यक्तित्व विकास मंचच्या सन्माननीय सदस्या लेखिका कवयित्री डॉ.राणी खेडीकर लिखित अप्रतिम लेख*

*बालमनास खाऊ पुरवणाऱ्या डॉ.राणी खेडीकर*

वंचित बालकांना जीवनाच्या प्रवाहात आणू या…..

बालमनास खाऊ पुरवून त्याचं मन सशक्त व्हावं यासाठी बाल्यावस्था, कौमार्य अवस्थेतील मुलांचे मन दत्तक घेऊन कार्य करण्याचं अगळं वेगळं काम डॉ.राणी दुष्यंत खेडीकर या करीत आहेत.
बहु आयामी व्यक्तिमत्व म्हणजे डॉ.राणी दुष्यंत खेडिकर.सामाजिक जाणीव असणं आणि ती जपण्यासाठी सातत्याने प्रयत्न करीत राहणं, ही त्यांची ओळख आहे. अनेक गुण वैशिष्ट्यांची सुरेख किनार लाभलेल्या डॉ.राणी यांनी समाजकार्य आणि बाल मानसशास्त्र या विषयाचा सखोल अभ्यास केला आहे.
डॉ. सौ राणी यांनी ‘वेश्या व्यवसाय  करणाऱ्या मातांच्या अपत्यांचा
कौटुंबिक,सामाजीक, मानसिक, आरोग्यासंबधी अभ्यास’ या विषया वर आचार्य पदवी प्राप्त केली आहे.या विषया वर आचार्य पदवी प्राप्त करणाऱ्या या महाराष्ट्रातील पहिल्या महिला अभ्यासक आहेत.
भावी पिढीचा एक महत्वाचा आणि तरीही दुर्लक्षित असा घटक म्हणजे वेश्या-मातांची मुलं. भयाण वातावरणात जन्म घेणारी ही निष्पाप मुलं आपलं बालपण अत्यंत असुरक्षित अशा वस्तीत व्यतीत करीत आहेत आणि बालहक्काच्या मूलभूत गोष्टी देखील या बालकांना उपलब्ध होत नाही.
आपल्या या समाजात अशी दुर्लक्षित आणि असुरक्षित आयुष्य जगणारी मुलं आहेत, आणि त्यांना देखील सामान्य प्रवाहात येण्याचे स्वप्न आणि इच्छा आहे याची जाणीव असणं गरजेचं आहे. कारण पुढे याच पिढीचा सकारात्मक आणि सक्षम विचारांच्या पायावर समाजात समान संधी व सामान न्यायाची बांधणी करू शकणार आणि या दुर्लक्षित बालकांना समाजाच्या सामान्य प्रवाहात त्यांना त्यांची जागा निर्माण करण्यास मदत होऊ शकणार आहे .या निष्पाप बाळांना समाजाच्या मुख्य प्रवाहात सामील होऊन सामान्य जीवन जगता यावं आणि त्यांचं होरपळलेलं बालपण सुरक्षित होऊन एक सक्षम नवीन पिढी निर्माण व्हावी. अशा सकारात्मक विचारांची पेरणी आपल्या कार्या द्वारे डॉ राणी यांनी केली आहे .
डॉ राणी यांचा संधीप्त परिचय देतोय.
अध्यक्षा
बाल कल्याण समिती पुणे भाग 1
महिला बाल कल्याण विभाग
महाराष्ट्र शासन

सिडनी ऑस्ट्रेलिया आकाशवाणी ला यांची मुलाखत झाली आहे

अमेरिका येथील रुबरू या कार्यक्रमात देखील मुलाखत झाली आहे.
मुंबई आकाशवाणी ला मुलाखत झाली आहे तसेच विश्वास रेडिओ ला पण मुलाखत झाली आहे.
डॉ. सौ राणी दुष्यंत खेडीकर यांनी वेश्या व्यवसाय करणाऱ्या मातांच्या अपत्यांच्या कौटुंबिक,सामाजिक, मानसिक,आरोग्य संबधी अभ्यास या विषयावर आचार्य पदवी प्राप्त केली आहे.
या विषयावर आचार्य पदवी प्राप्त करणाऱ्या या महाराष्ट्रातील पहिल्या महिला अभ्यासक आहेत.या विषयावर त्यांची पुस्तक प्रकाशित आहेत.
डॉ निशिगंधा वाड मॅडम यांच्या सोबत एक शॉर्ट फिल्म चे काम सुरू आहे.
अनेक पुरस्कारांनी सन्मानित आहेत.
1.कमलताई होस्पेट पुरस्कार
2..सावित्री बाई फुले राष्ट्रीय पुरस्कार, कर्नाटक राज्य.
3..राष्ट्रपिता महात्मा गांधी साहित्य. राष्ट्रीय पुरस्कार गुजराथ
4.महाराष्ट्र शासन शालेय शिक्षण व
क्रीडा विभाग राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद, महाराष्ट्र पुणे. यांच्या तर्फे कर्तुत्ववान स्त्रियांचा सन्मान पुरस्कार
5.सावित्रीची लेक राज्य पुरस्कार
6.रोटरी क्लब सन्मान पुरस्कार
महाराष्ट्र लक्षवेधी पुरस्कार
7..नारीशक्ती पुरस्कार.पिंपरी चिंचवड पोलीस आयुक्तालय पुणे
8.कालिका महिला रत्न पुरस्कार 2022
पालकत्व या विषयावर संपूर्ण महाराष्ट्रात कार्यशाळा घेत असतात .
अनेक सामाजिक संस्था वर महत्त्वाच्या पदावर कार्यरत आहेत.
अध्यक्षा (ट्रस्टी)- Golden letters बाल विकास संस्था महाराष्ट्र
पाटी पुस्तक – International project of education n health
विश्वस्त – सूर फाऊंडेशन – नागपूर

महिला संघ महाराष्ट्र बालक पालक सल्लागार
अनेक वृत्तपत्रातून, मासिकातून लेखन केलं आहे.
किंडल अमेझॉन वर मराठी आणि इंग्रजी भाषेतून पुस्तकं, काव्य संग्रह प्रकाशित झाले आहेत.
ग्रंथाली प्रकाशन त र्फे ग्रंथाली दिनाला 25 डिसेंबर 2021 ला “लल दिव्याची वस्ती आणि निष्पाप बालपण” हे पुस्तक प्रकाशित झालं.
तसेच त्यांनी लिहिलेल्या ‘लाल दिव्याच्या वस्तीवरच्या सत्यकथा’ यावर लवकरच डॉक्युमेंटरी फिल्म प्रदर्शित होणार आहे.
त्यांची मराठी व इंग्रजी मध्ये वृत्तपत्र,मासिक या माध्यमातून त्यांनी प्रभावी लेखन केलं आहे. तसेच त्यांचा संशोधन विषय, “रेड झोन मधील माता आणि त्यांची अपत्ये ” त्यांचा
मानसिक,सामाजिक दृष्टीने अभ्यास” यातील सत्यकथा (case work) वीस लेखांचं सदर ‘रयतेचा वाली’ या अत्यंत दर्जेदार,उत्कृष्ट शैक्षणिक दैनिकात प्रकाशित झालं आहे. त्या काव्य लेखन देखील करतात.त्यांच्या हजाराच्या वर चारोळ्या व कविता प्रकाशित झाल्या आहेत. वास्तुशास्त्र (stone therapy) या विषयावर त्यांनी डिप्लोमा केला आहे, तसेच त्यावर त्या यशस्वी कार्य करत आहेत. पाककला व संतुलित आहार संबंधी त्या व्याख्यान देत असतात. कला, लिखाण असो वा संशोधन कार्य अथवा समाज कार्य अनेक क्षेत्रात डॉ.राणी यांनी आपली यशस्वी छाप उमटवली आहे.
रेड झोन माता आणि त्यांची अपत्ये त्यांचा मानसिक,सामाजिक दृष्टीने अभ्यास करून हा गंभीर विषय संशोधनाच्या माध्यमातून सोडवण्यासाठी कार्य करणाऱ्या डॉ राणी यांच कार्य खरंच अभिमास्पद आहे. त्यांच्या या कार्याला माझा सलाम.
बाल मानसशास्त्र या विषयात विशेष रुची आणि अभ्यास असल्यामुळे  डॉ.राणी कुठल्याही समस्येशी झुंज देणाऱ्या लहान मुलां संबंधी कार्यात त्या विशेष अग्रेसर असतात.भावी पिढीचा एक मोठा हिस्सा म्हणजे बाल्यावस्थेतील मुलं,ही मुलं निराधार असो , कुटुंबात असो,वा असुरक्षित परिस्थितीत जगणारी मुलं असो,अनेक प्रकारच्या समस्या त्यांना नकळत स्पर्शून जातात, त्यामुळे त्यांचं मानसिक खच्चीकरण होत जातं आणि ही मुलं हळूहळू वाममार्गाला लागण्याची शक्यता बळावत जाते.
पालकत्व या विषयावर कार्यशाळा घेताना व पालक आणि मुलं यांच्या समस्यांचा अभ्यास व काऊंसेलींग करताना येणाऱ्या अनेक अनुभवांचा त्यांनी उल्लेख केला.
मुलं वास्तव नाकारून काल्पनिक विश्वात रमू लागली आहें ,नव्हें तेच खरं समजू लागली आहे.ही परिस्थिती दिवसेंदिवस भयानक रूप घेतेय.पालकांना याची गंभीरता लक्षात घेणं खूप गरजेच आहे. मुलं का एकलकोंडी होतात? कोणी पाहुणे आले की, त्यांच्याशी न बोलता आपल्या बंद खोलीत का जातात?चार माणसांशी बोलताना त्यांना अवघडल्या सारखं का होतं?ते कायम एखाद्या वेगळ्याच विश्वात का वावरतात? असे प्रश्न निर्माण झाल्यास पालकांनी पाल्याशी संवाद साधणं खूप आवश्यक आहे.
बाल्यावस्थेत असताना संपूर्ण जग मुलांना नवीन असतं.सगळ्याच गोष्टी विषयी कमालीचं कूतूहल असतं.त्यांना अनेक प्रश्न सतावतात.अडीच ते तीन वर्षांचं मुलं दिवसभरात तीनशे ते चारशे प्रश्न विचारात असतं.असा who चा अभ्यास सांगतो.मग इतक्या प्रश्नांची उत्तरं देण्याची आपली तयारी असते का?
प्रचंड गोंधळात मुलं मोठी होत जातात.पालक एकाच विचाराने प्रेरित
असतात.आम्हाला जो त्रास भोगावा लागला तो मुलांना भोगावा लागू नये.परंतु त्यामुळे ते पाल्यांना पांगळे करत असतात.त्यांना भविष्यात येणाऱ्या गोष्टीसाठी तयार करण्या ऐवजी खोट्या चित्राचं आवरण रंगवत जातात.
मुलांना सुरक्षित
ठेऊन,समस्येची झळ न पोहोचू देता त्याची खरी जाणीव देत सक्षम करत जाणं,ही पालकांची खरी भूमिका आहे हे ते विसरत जातात.आणि त्यांच्या या अट्टाहासा मुळे मुलं मानसिक रित्या दुबळी होत जातात,अनेक समस्यांना त्यांना सामोरे जावं
लागतं,असं त्या म्हणाल्या.
डॉ.राणी गेली बारा वर्षे मुलांच्या समस्यांचा अभ्‍यास व त्यावर अनेक संस्थांच्या माध्यमातून कार्य करीत आहेत. बाल्यावस्था, कौमार्य अवस्था या काळात मुलांच्या विचारांना विशिष्ट अशी दिशा मिळत असते आणि याच काळात त्यांना सत्य परिस्थिती अवगत करून देऊन एक सुदृढ वातावरण देणं गरजेचं असतं.नाहीतर मुलं चुकीचे निर्णय घेण्यास प्रवृत्त होतात.कमी वयात घरून निघून जाणारी मुलं पुढे आपलं संपूर्ण आयुष्य असुरक्षित करतात.
या संदर्भात डॉ.राणी यांनी बाल्यावस्था, कौमार्य अवस्था या गटातील मुलं मानसिक रित्या सुदृढ राहावी आणि त्यांचं बालपण फुलत जाऊन ते एक सक्षम नागरिक म्हणून भावी पिढी घडवू शकतील यासाठी मुलांना मानसिक रित्या दत्तक घेऊन त्यांनी त्यासाठी लागणाऱ्या सगळ्या गोष्टी पूर्ण करण्यासाठी कार्य सुरू केलं आहे.अगदी सुंदर अशी ही संकल्पना आहे. नागपूर,मुंबई येथील काही संस्थांच्या माध्यमातून त्या हे कार्य करीत आहेत.अनेक शाळाशी संपर्क साधून, कार्य शाळा घेऊन त्यांचं हे कार्य सुरू आहे.
बाल्यावस्थेतील मुलं हे भावी नागरिक आहेत.संपूर्ण समाज कुठल्या दिशेने जाणार आहे, याची चावी या मुलांच्या हातात आहे.म्हणून त्या समाजाची पाया भरणी कशी असावी यावर काम होणं नितांत गरजेचं आहे.मुलांच्या मानसिक आरोग्याकडे विशेष लक्ष देऊन त्यांना योग्य ते मार्गदर्शन आणि
मानसिकरीत्या सदृढ होण्याच्या दृष्टीने  मनाचा खाऊ पुरविण्याचं अत्यंत महत्त्वाचं असं काम डॉ.राणी यांनी हाती घेतलं आहे.
गोल्डन लेटर्स या संस्थेच्या त्या अध्यक्षा आहेत.संस्थेचा मुख्य उद्देश कुठल्याही कारणाने शिक्षणा पासून वंचित असणाऱ्या शाळा बाह्य मुलांना शिक्षणाच्या प्रवाहात आणून त्यांना जीवनाच्या प्रवाहात आणण्यासाठी प्रयत्न करणं असा आहे. संपूर्ण भारतातून शिक्षक, शिक्षणप्रेमी या
कार्याला जोडले गेले आहेत.शाळा बाह्य मुलांचे शैक्षणिक पालकत्व ही संस्था घेत आहे.
बालरोग तज्ञ,बाल मानस तज्ञ,शिक्षक,पालक या सगळ्यांच्या मदत आणि सहकार्याने हे कार्य सुरू आहे,आणि पुढे पण सातत्याने हे कार्य सुरू राहणार अशी सदिच्छा मी व्यक्त करतो
त्यांच्या या अत्यंत मोलाच्या कार्यात आपण सगळेच सामील होऊन भावी पिढीची मजबूत पायाभरणी करू या. मी जनसंपर्क अधिकारी म्हणून गोल्डन लेटर्स संस्थेच्या कार्यास वाहून घेतले आहे,आपणही इच्छुक असाल तर कळवा.

विलास कुलकर्णी
मीरा रोड
7506848664

 

*संवाद मिडिया*

*_🏠तुमच्या स्वप्नाला वळण देणारा, एक सुंदर प्रयत्न जो बदलेल तुमच्या जीवनाला !!!!🏠_*

*⚜️”रॉयल सिटी पार्क” मुंबईतील नामांकित बिल्डर्सचा ऐश्वर्य संपन्न गृहप्रकल्प प्रत्यक्ष रत्नागिरीत !⚜️*

*▫️*वैशिषट्यपूर्ण घरकुलाची सुसज्य मांडणी आणि आधुनिक सुविधांनी परिपूर्ण वास्तूचे रूप, आपल्याला इथेच पाहायला मिळेल. मुंबई पद्धतीने बनवलेला डिलक्स फ्लॅट तोही सर्वसामान्यांना परवडेल असा. त्याच प्रमाणे *_NO GST / OC COMPLETE / READY POSSESSION._*

💫 *_आपल्या प्रोजेक्टची खास वैशिषट्ये_* 💫

*१) रेडीमेड मॉड्यूलर किचन ट्रॉलीसहित .*
*२) बाथरुम जग्वार फिटिंग, पूर्ण फ्लॅट कंन्सिल्ड इलेक्ट्रिक, ट्यूब्स, फॅन, गिझर, एक्झॉस्ट फॅन, बल्ब फिटींग,*
*३)पूर्ण फ्लॅट पी.ओ.पी मोल्डींग*
*४) वॉकिंग ट्रॅक, चिलड्रन्स प्ले गार्डन*
*५) अत्याधुनिक लिफ्ट (ISI mark)*
*६) आकर्षक इंट्रन्स लॉबी, रेन वॉटर हार्वेस्टिंग.*
*७) भरपूर पाणी , प्रशस्त पार्किंग व्यवस्था.*
*८) जवळच शाळा , मंदिर , मार्केट.*
*९) १००% गृहकर्ज सुविधा उपलब्ध.*

🌐 *प्रोजेक्टच्या अधिक माहिती साठी या लिंक वर क्लिक करा*👇🏻

*☎️ बुकिंग संपर्क ☎️*

Rakhi : 9209193470.

Mahesh Bhai :9820219208.

Sharad : 8600372023.

🛑 *साईटचा पत्ता* 🛑

*रॉयल सिटी पार्क, रवींद्र नगर ,सेंट थॉमस स्कूल जवळ , (श्री स्वामीसमर्थ मठ) कारवांची वाडी, कुवारबाव रत्नागिरी*

📢 *मोजकेच फ्लॅट शिल्लक, आजच बुक करा*

प्रतिक्रिया व्यक्त करा