You are currently viewing सरपंच हा गावचा मुख्यमंत्री : केंद्रिय मंत्री नारायण राणे

सरपंच हा गावचा मुख्यमंत्री : केंद्रिय मंत्री नारायण राणे

जनतेसाठी काम करा व आपली कर्तबगारी दाखवा. जनतेचे व भाजप कार्यकर्त्यांचे कौतूक. : केंद्रिय मंत्री नारायण राणे

कुडाळ

सरकार कडून येणारा निधी टक्केवारीचे अर्थकारण न करता गावातील विकासासाठी व जनतेच्या कल्याणासाठी खर्च व्हायला हवा! यासाठी सरपंचाचे काम व कार्य महत्वाचे असून सरपंच हा गावचा मुख्यमंत्रीच असतो. व याची जाणिव ठेव जनसेवक म्हणून काम करा व पदाचा सन्मान ठेवून आणखी मोठे व्हा. यश मिळवण सोप असत पण ते टिकवण कठीण असत हे भान ठेवून आपली कर्तबगारीन पदावी शान वाढवा! असे भावनिक उद्गार केंद्रीय मंत्री ना नारायण राणे यांनी पडवे येथील कुडाळ, मालवण नवनिर्वाचीत सरपंच व ग्राम पंचायत सदस्यांच्या सत्कार सोहळ्यात बोलतांना काढले.

या निवडणूकीत भाजपाच्या बाजूने सिंधुदुर्ग वासीयांनी जो कौल दिला त्याबद्दलही ना राणे यांनी जिल्हावासीय जनता व भाजप कार्यकर्त्यांचे कौतूक केले. या कार्यक्रमाच्या व्यासपिठावर भाजपाचे प्रदेश सचिव निलेश राणे भाजपाचे जिल्हाध्यक्ष राजन तेली, महिला जिल्हाध्यक्षा सौ संध्या तेरसे,अशोक सावंत, दत्ता सामंत, रणजित देसाई, विजय केनवडेकर आदी मान्यवर उपस्थित होते.

ज्याप्रमाणे राज्याचा प्रमुख मुख्यमंत्री असतो तसाच गावाचा प्रमुख हा सरपंच असतो सरपंचाने आपल्या गावामध्ये लोकांसाठी विविध योजना आणून आपला गाव विकसित केला पाहिजे आपण लोकसेवक आहोत हे लक्षात ठेव काम केले पाहिजे. कुठेही आपले नाव टक्केवारीमध्ये येऊ नये याची दक्षता सरपंच व सदस्यांनी घेतली पाहिजे असे प्रतिपादन केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी कुडाळ व मालवण तालुक्यामध्ये भाजप प्रणित पॅनल मधून निवडून आलेल्या सरपंच व सदस्यांच्या सत्कार कार्यक्रमात करून जगात कोणताही साबण भ्रष्टाचाराचे डाग घालवू शकत नाही हे लक्षात ठेवून काम करा असे आवाहन यावेळी केले.

ग्रामपंचायतच्या झालेल्या सार्वत्रिक निवडणुकीमध्ये कुडाळ व मालवण तालुक्यामध्ये भाजप प्रणित पॅनेलमधून सरपंच व सदस्य निवडून आल्यानंतर त्यांचे सत्कार पडवे येथील लाईफ टाईम हॉस्पिटल येथे करण्यात आले यावेळी केंद्रीय मंत्री नारायण राणे, राज्याचे सरचिटणीस व माजी खासदार निलेश राणे, जिल्हाध्यक्ष राजन तेली, महिला जिल्हाध्यक्ष संध्या तेरसे, प्रदेश सदस्य दत्ता सामंत, अशोक सावंत, रणजीत देसाई, विजय केनवडेकर, कुडाळ तालुकाध्यक्ष विनायक राणे, मालवण तालुकाध्यक्ष धोंडी चिंदरकर आदी पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित होते.

यावेळी केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी सांगितले की सिंधुदुर्ग जिल्ह्यात भाजपला जे ग्रामपंचायत निवडणूक मध्ये यश आले आहे ते तुमचे आहे कार्यकर्त्यांनी केलेल्या मेहनतीचे आहे मी या ठिकाणी नसताना जे यश मिळाले त्यात मी समाधानी आहे. असे सांगून ज्याप्रमाणे राज्याचा मुख्यमंत्री प्रमुख असतो त्याप्रमाणे सरपंच हा गावाचा प्रमुख असतो त्याने गावातील लोकांच्या समस्या सोडवणे त्याचे काम असते लोकांसाठी विविध योजना राबवून गावाचा विकास करणे तसेच शासनाच्या योजना गावांमध्ये राबवून त्याचा लाभ जनतेला देणे हे सुद्धा सरपंचाचे काम आहे कोणत्याही प्रकारे टक्केवारी मध्ये आपले नाव येणार नाही आणि आपण बदनाम होणार नाही याकडे दक्षता घेतली पाहिजे कारण आपण लोकसेवक आहोत एकदा लागलेला भ्रष्टाचाराचा डाग पुसण्यासाठी कोणताही जगात साबण बनलेला नाही हे लक्षात घ्या शासन स्तरावरचे योजना गावापर्यंत राबवण्यासाठी आम्ही सुद्धा तुम्हाला सहकार्य करू फक्त त्याची अंमलबजावणी चांगली झाली पाहिजे असे त्यांनी सांगितले. जे तुम्ही आता काम करणार त्या कामावर पुढील येणाऱ्या निवडणुकांचे भवितव्य ठरणार आहे त्यामुळे प्रामाणिक आणि कर्तव्यदक्ष म्हणून काम करा असे आवाहन त्यांनी केले.

तालुक्यातील ३२ ग्रामपंचायती भाजपकडे आले आहेत मालवण तालुक्यातील २४० अधिक आणि कुडाळ तालुक्यातील २३५ जास्त सदस्यांचा सत्कार यावेळी केंद्रीय मंत्री नारायण राणे यांच्या हस्ते करण्यात आला. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन ओरोस मंडळ अध्यक्ष दादा साईल यांनी केले.

प्रतिक्रिया व्यक्त करा