You are currently viewing आचरा ते कांदळगाव बसफेरी पूर्ववत सुरू करावी; सरपंच उमदी परब यांची मागणी

आचरा ते कांदळगाव बसफेरी पूर्ववत सुरू करावी; सरपंच उमदी परब यांची मागणी

कांदळगाव :

 

आचरा ते कांदळगाव मार्गे कुडाळ ही सकाळी 6.30 वाजता सुटणारी बस फेरी बंद असल्याने सदर बसफेरी पूर्ववत करावी, अशी मागणी कांदळगाव सरपंच उमदी उदय परब यांनी मालवण एसटी आगार व कणकवली विभाग नियंत्रण यांच्याजवळ लेखी निवेदनाद्वारे केली आहे. कोरोना कालावधी पूर्वी कुडाळ आचरा ही कुडाळ डेपोची सकाळी 6.30 वाजता सुटणारी एसटी सकाळी 7 वा. च्या दरम्यान कांदळगाव राणेवाडी, रतांबी स्टॉप मार्गे रामेश्वर मंदिर या ठिकाणाहून मालवण कुडाळला जात होती. सदर गाडीमध्ये कांदळगाव मधील बहुतांशी शाळा, कॉलेजचे विद्यार्थी जात होते. परंतु कोरोना कालावधीनंतर सदरची गाडी बंद असल्यामुळे कांदळगावातील विद्यार्थ्यांना जाणे गैरसोयीचे होत आहे. परिणामी शालेय विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होत आहे. तरी आपणास विनंती आहे की गाडी पूर्वीप्रमाणे नियमित सुरू केल्यास विद्यार्थ्यांची व ग्रामस्थांची होणारी गैरसोय दूर होईल. तरी लवकरात लवकर सदरची गाडी सुरू करण्यात यावी, अशी मागणी सरपंच सौ उमदी परब यांनी केली आहे.

प्रतिक्रिया व्यक्त करा