You are currently viewing घड्याळ

घड्याळ

जागतिक साहित्य कला व्यक्तित्व विकास मंच सदस्या लेखिका कवयित्री भारती वाघमारे यांची अप्रतिम काव्यरचना

पुर्वी सगळ्यांकडे
घड्याळ नसायची
दारातील सावलिवर
अचुक वेळ ठरायची

शाळेची घंटा वाजली की
कामाची वेळ ठरायची
भाकरीची पाटी घेऊन
कारभारीन शेताची वाट धरायची

कारखान्याचा वाजला भोंगा की
दुपारची जेवणाची वेळ व्हायची
मुलं सगळी आट्या पाट्या धपाट्या,
खेळ मैदानात खेळायची.

सूर्य मावळतीला जाताना
सुट्टी कामाची व्हायची
घरी जाता जाता
दिवेलागणीची वेळ व्हायची.

घरी जाऊन कारभारीन
चुलीवर भाकरी भाजायची.
गरम भाजी भाकरी
पोटभर खायची.

काम करून दमल्यावर
लगेच झोपी जायची
कोंबड लागले आरवायला कि,
तेव्हाच सगळी उठायची.

आता तर बारा अंकी घड्याळ
सतत जवळ असत
तरिही कामाचे टाईम
टेबल
अचूक ठरत नसत

घड्याळ पाहिल्याशिवाय
वेळ कळत नाही
अलाराम वाजल्याशिवाय आपल्या दिवस उगत नाही.

सौ भारती वसंत वाघमारे
मंचर

प्रतिक्रिया व्यक्त करा

three × 5 =