You are currently viewing राम महिमा

राम महिमा

जागतिक साहित्य कला व्यक्तित्व विकास मंच सदस्या ज्येष्ठ लेखिका कवयित्री सौ अनिता व्यवहारे यांचा अप्रतिम लेख

लोकाभिरामं रणरंगधीरं राजीव नेत्रम रघुवंशनाथम
कारुण्य रूपं करुणाकरं श्रीरामचंद्र शरणं प्रपद्ये
. जय श्रीराम
चैत्र महिन्यातील राम नवमी चा दिवस या दिवशी प्रभू रामचंद्रांनी पुन्हा अवतार घेतला. जय श्रीराम
*दोन अक्षरी शब्द पण* प्रत्येकाच्या जीवनात आणि जगण्यात नवसंजीवनी देणारा तो महान मंत्र ठरला. वाल्या कोळ्याचा महर्षी वाल्मिकी ऋषी याच दोन अक्षरांनी घडविला. वाल्मिकींना इतकी अगाध शक्ती या मंत्रातून प्राप्त झाली की त्यांनी “आधी लिहिले मग घडले” असे हे रामायण.. राम लक्ष्मण आणि सीता यांच्या विषयी रामायण हा ग्रंथ आपल्याला नवीन नाही. रामायणा बरोबरच आपल्याकडे महाभारत हा ग्रंथ ही तितकाच पवित्र मानला जातो.
सत्यम शिवम सुंदरम अशा भारतीय संस्कृतीत श्रेष्ठ असे भक्ती पंथ
त्यातले रामायण-महाभारत ठरले दोन ग्रंथ
महाभारत सांगून जाते सार जगण्याचे आणि जगताचे.
रामायण शिकवते संस्कार आदर्श जीवनाचे.
अगदी परदेशातही हे संस्कार जाऊन पोहोचले आहेत. रामाची सीता कोण? हा प्रश्न भारतातही आणि भारता बाहेर ही कधी अनुत्तरीत राहिला नाही. राम लक्ष्मण सीता यांच्या कथा संपूर्ण जनतेला ज्ञात आहेत तशा सातासमुद्रापलीकडे जय श्रीराम घराघरात जाऊन पोहोचले आहेत. राम सीताआणि लक्ष्मण यांच्याबरोबर लंकाधिपती रावण असो वा रामभक्त बिभीषन असो वा रामभक्त दास महाबली हनुमान असो साऱ्या जगती ते श्रेष्ठ ठरले आहेत. रामायण हे संपूर्ण मानवजातीसाठी संस्कारांचं कोठार आहे. जसे महर्षी व्यासांनी सांगितलेले महा भारतात जगात ज्या गोष्टी घडतात त्या साऱ्यांचा अंतर्भाव आहे तसेच जगातील सर्वात श्रेष्ठ असलेले कुटुंब संस्कार रामायणात पाहायला मिळतात नात्यांची गुंफण नाती जगण्याचे संस्कार हे आपल्याला रामायणातून प्राप्त झाले आहेत असं म्हणावं लागेल.
राजा दशरथाचा पुत्र राम आदर्श राजा आज्ञाधारक मुलगा, कर्तव्यनिष्ठ बंधू आणि प्रेमळ सखा..अशा प्रत्येक भूमिकेतून श्रीरामांनी एक वेगळा आदर्श घालून दिला.
एक पत्नी एक वचनी असलेल्या प्रभू रामचंद्रां विषयी नुकतीच मी एक कथा ऐकली. रामनवमीच्या दिवशी प्रभू रामचंद्रांनी अवतार घेतला त्यावेळी जन्मताच अतिशय गोजिरवाणा, दिव्य असा लोभस मोहक सौंदर्य घेऊन जन्माला आलेल्या या बालकाला पाहायला सर्व देव देवता स्वर्गातुन खाली अवतरल्या. यावेळी सूर्यनारायण देखील प्रभू रामाच्या दर्शनाला आले. प्रभुंचे ते रूप पाहून सूर्यनारायणाचे समाधान होईना ते त्या दिव्यत्वाकडे पाहातच राहीले. ते आपली जागा ही सोडेनात जागेवरून हालेनात. मग झाली पंचाईत.ते गे ल्याशिवाय चंद्राला हे रूप पाहायला येता येत नव्हते त्यामुळे विनवण्या करून ते थकले आणि दुःखी होऊन दुखी व लट्टू होऊन बसले शेवटी ते प्रभू रामचंद्रा कडे गेले प्रभू रामचंद्रांनी ही खूप समजावण्याचा प्रयत्न केला पण तरीही सूर्यनारायण तसे हट्टीच. त्यांनी त्यांचे ही ऐकले नाही. शितल चंद्र शांत राहिला शेवटी प्रभू रामचंद्रांनी त्यांना आपल्या नावापुढे ठेऊन घेण्याचे वरदान दिले म्हणाले, आजपासून माझ्या नावापुढे तुझे नाव लावले जाईल. श्री रामचंद्र आणि पुढच्या जन्मी सगळ्यात अगोदर मी तुला दर्शन देईल तेव्हा कुठे चंद्राचे समाधान झाले. अशी ही एक वाचलेली अख्यायिका …अन असे हे आपले महा दैवत ‘श्री प्रभू रामचंद्र.’ .

🙏🌹 जय श्रीराम.🌹🙏

सौ अनिता व्यवहारे
ता श्रीरामपूर जि अहमदनगर

.

प्रतिक्रिया व्यक्त करा

eighteen + 13 =