रत्नागिरी-कोल्हापूर राष्ट्रीय महामार्गावर साखरपा ते आंबा या दरम्यान आंबा घाटात १२ ठिकाणी दरड कोसळल्यामुळे व ३ ठिकाणी रस्त्याचा भाग तूटल्यामुळे महामार्गाचे मोठे नुकसान झाले. त्यामुळे अजून ५ दिवस दुरुस्तीसाठी हा रस्ता बंद ठेवण्यात येणार आहे. नुकत्याच कोसळलेल्या मुसळधार पावसामुळे अनेक भागांना पुराचा तडाखा बसला. तर डोंगराळ भागात दरड कोसळण्याच्या अनेक घटना घडल्या आहेत. रत्नागिरी व कोल्हापूरला जोडणाऱ्या आंबा घाटात तब्बल १२ ठिकाणी दरड कोसळून मोठ्या प्रमाणात माती व दगडांचा ढिगारा रस्त्यावर आला आहे.
रत्नागिरी कोल्हापूर महामार्ग अजून ५ दिवस राहणार बंद
- Post published:जुलै 29, 2021
- Post category:बातम्या / विशेष
- Post comments:0 Comments
You Might Also Like
डोंगर पोखरून उंदीर काढण्याचा प्रकार… पोलिसांचा आंबोली- चौकुळ येथील डार्क फॉरेस्ट हॉटेलवर छापा
२० नोव्हेंबर २०२२ रोजी कट्टा येथे श्री देव लिंगेश्वर-भराडी देवी वार्षिक जत्रौत्सव
आमदार नितेश राणे याचे मतदारसंघातील काम अतिशय चांगले,शिक्षण मंत्री केसरकर यांचेकडून कौतुक
