रत्नागिरी-कोल्हापूर राष्ट्रीय महामार्गावर साखरपा ते आंबा या दरम्यान आंबा घाटात १२ ठिकाणी दरड कोसळल्यामुळे व ३ ठिकाणी रस्त्याचा भाग तूटल्यामुळे महामार्गाचे मोठे नुकसान झाले. त्यामुळे अजून ५ दिवस दुरुस्तीसाठी हा रस्ता बंद ठेवण्यात येणार आहे. नुकत्याच कोसळलेल्या मुसळधार पावसामुळे अनेक भागांना पुराचा तडाखा बसला. तर डोंगराळ भागात दरड कोसळण्याच्या अनेक घटना घडल्या आहेत. रत्नागिरी व कोल्हापूरला जोडणाऱ्या आंबा घाटात तब्बल १२ ठिकाणी दरड कोसळून मोठ्या प्रमाणात माती व दगडांचा ढिगारा रस्त्यावर आला आहे.

रत्नागिरी कोल्हापूर महामार्ग अजून ५ दिवस राहणार बंद
- Post published:जुलै 29, 2021
- Post category:बातम्या / विशेष
- Post comments:0 Comments
You Might Also Like

महिला समाज आश्रम समोरील रस्त्या संदर्भात सालईवाड्यातील नागरिक करणार २६ जानेवारी २०२३ रोजी लाक्षणिक उपोषण

कुडाळात शिवसेना – राष्ट्रवादी काँग्रेस आघाडीच्या प्रचार रॅलीस उत्स्फूर्त प्रतिसाद

महाभूमी प्रकल्पाच्या राज्यसमन्वयकांच्या बदलीसाठी तलाठ्यांचे देवगड येथे आंदोलन
