रत्नागिरी-कोल्हापूर राष्ट्रीय महामार्गावर साखरपा ते आंबा या दरम्यान आंबा घाटात १२ ठिकाणी दरड कोसळल्यामुळे व ३ ठिकाणी रस्त्याचा भाग तूटल्यामुळे महामार्गाचे मोठे नुकसान झाले. त्यामुळे अजून ५ दिवस दुरुस्तीसाठी हा रस्ता बंद ठेवण्यात येणार आहे. नुकत्याच कोसळलेल्या मुसळधार पावसामुळे अनेक भागांना पुराचा तडाखा बसला. तर डोंगराळ भागात दरड कोसळण्याच्या अनेक घटना घडल्या आहेत. रत्नागिरी व कोल्हापूरला जोडणाऱ्या आंबा घाटात तब्बल १२ ठिकाणी दरड कोसळून मोठ्या प्रमाणात माती व दगडांचा ढिगारा रस्त्यावर आला आहे.

रत्नागिरी कोल्हापूर महामार्ग अजून ५ दिवस राहणार बंद
- Post published:जुलै 29, 2021
- Post category:बातम्या / विशेष
- Post comments:0 Comments
You Might Also Like
इनामदार श्री देव रामेश्वर आचरा रामनवमी उत्सवास येणाऱ्या भाविकांचे हार्दिक स्वागत ! – श्री स्वामी समर्थ शिपिंग कंपनी
कणकवलीत उड्डाणपूल दुरुस्तीचे काम नगरसेवक शिशिर परुळेकर, महेश सावंत यांनी पाडले बंद…
नवसाला पावणार्या श्री देवी आंगणेवाडी भराडी मातेच्या जत्रा उत्सवास येणाऱ्या भाविकांचे हार्दिक स्वागत! – श्री. सुनील घाडीगावकर
