*ज्येष्ठ साहित्यिका, उपक्रमशील आदर्श शिक्षिका , समाजसेविका, कथाकार, पर्यावरण प्रेमी लेखिका कवयित्री अनुपमा जाधव लिखित अप्रतिम काव्यरचना*
*येरे पावसा लवकर*
पावसा पावसा
ये लवकर
तप्त झाली भूमी
दे पर्जन्य धारा
आनंद जीवनी!
बळीराजा बघ
आकाशकडे डोळे लावून
बसलाय!
तू मात्र का बर
रुसलास?
गाई, गुरे, वासरे
चिमणी पाखरे
झाले व्याकुळ
बरस एकदा जोराने
पाहिजे तर
घाल धुमाकूळ!
नदी, नाले, विहिरी,
तलाव
गेलेत रे सुकून
उष्णतेची वाढली
दाहकता म्हणून
पर्जन्यने दे भरुन..!
दुष्काळग्रस्त भागात
नाही पिण्यास ही पाणी
सांग बर मग
कशी सुचतील
पावसाची गाणी…!
नको काढूस आता
बळीराजाच्या डोळ्यातून
पाणी….!
बरस एकदा जोमाने
अंगणात वाहू दे पाणी!
कागदी होड्या पाण्यात
सोडून गोड गाऊ आम्ही गाणी!
अनुपमा जाधव
