*जागतिक साहित्य कला व्यक्तित्व विकास मंचचे सन्मा सदस्य ज्येष्ठ कवी गीतकार गायक संगीतकार श्री अरुणजी गांगल लिखित अप्रतिम काव्यरचना*
*”छत्रपती शिवाजी राजांचा राज्याभिषेक सोहळा”*
हिंदवी शिवस्वराज्याचे स्वप्न झाले पूर्ण
रायगडां राज्याभिषेक सोहळा झाला संपन्नIIधृII
भारतीय जन जगत होते सुख आनंदात
सुजलाम सुफलाम सहिष्णुता होता काळ
आदिल कुतुब निजाम शाहिंनी केले आक्रमणII1II
जिजाऊंनी बाळराजे पुढे ठेवले स्वराज्य स्वप्न
राजांनी इंग्रजांसह शत्रुंचा केला नायनाट
महाराजांनी शून्यातून विश्व केले निर्माणII2II
धर्म देशाप्रती जागवला भाव त्याग समर्पण
भयग्रस्त जनांना निर्भय केले प्राणपणानं
सतराव्या वर्षी स्वराज्याचे बांधले तोरणII3II
राज्याभिषेक सोहळ्यास आले राजे सरदार
विदेशासह सर्वजण आले नजराणा घेऊन
शिवराजांच्या राज्याभिषेकांस आतुरले जनII4II
महाराजांनी केले शुभ्र वस्त्र परिधान
गागाभट्टानी राज्याभिषेक केला मंत्रोच्चारात
बत्तीस मण सोन्याच्या सिंहासनी राजे आसनस्थII5II
महाराजांनी घेतले भवानी मातेचे दर्शन
जगदीश्वराचे दर्शन घेतले जिजाऊंचे आशीर्वाद
शक कालगणना निर्मिली नाणी शिवराई होनII6II
लिहून घेतले राज्यव्यवहारकोश ग्रंथ
लेखनप्रशस्ती लिहवले मराठी संस्कृत भाषांत
भगवा ध्वज उंच फडकावला जाणत्या राजानंII7II
©️काव्य:श्री अरुण गांगल कर्जत. रायगड महाराष्ट्र.
पिन.410201.Cell.9373811677.
