*ज्येष्ठ लेखिका कवयित्री चित्रकारा आदर्श शिक्षिका स्वप्नगंधा सतीश आंबेतकर लिखित अप्रतिम काव्यरचना*
*वाटसरू*
वाटेत चालतांना आले अडथळे
तरी चालत राहिलो तुडवीत काटे
झाले रक्तबंबाळ,तरी पाय मोकळे
करीत ,क्षिती न कुणा काय वाटे
/१/
ठरविले मनी होईन वाटसरू मी
येतील किती वादळे अनावधाने
सावरुन त्यातुनि खचित जाईन आवरुन स्वतःलाआत्मविश्वासाने
/२/
करांना स्पर्श विषारी काट्यांचा
त्याच करी दिधला गंध फुलांचा
ठेवले न मनी कपट कधी कुणाचे
वाटसरू होताना का राग कुणाचा /३/
जखमी मनाच्या वेदना उराशी
ठेचकाळत सोसल्या ऐकल्याने
भळभळत्या जखमा वाहूदिल्या
घाव तेच जपता सावरले जीवाने
/४/
एक आस ठेवली झगडेन स्वतःशी
परि अंतिम क्षणी ध्येय गाठेन मी
येवोत किती आवर्तने त्या गर्तेत
वाटसरू होऊन मार्ग दावेन मी.
/५/
स्वरचित स्वप्नगंधा सतीश आंबेतकर
विरार
