You are currently viewing श्री स्वामी समर्थ काव्यवंदना काव्यपुष्प- ४३ वे

श्री स्वामी समर्थ काव्यवंदना काव्यपुष्प- ४३ वे

*जागतिक साहित्य कला व्यक्तित्व विकास मंचचे सन्मा सदस्य ज्येष्ठ कवी अरुण वि देशपांडे लिखित अप्रतिम काव्यरचना*

 

।।श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ ।।

___________________________

श्री स्वामी समर्थ काव्यवंदना काव्यपुष्प- ४३ वे

श्री स्वामी भ्रमणगाथा ..

___________________________

 

श्री स्वामींच्या भ्रमणगाथेत एक राजूर गाव आहे । जे बीड जिल्ह्यात आहे । भारती संप्रदायाचा मठ ” अशी ज्याची ओळख आहे ।श्री स्वामींचे होते वास्तव्य याच मठात ।।१।।

 

चंचलभारती”हे स्वामींचे संबोधन होते । हे नाव पंचक्रोशीत प्रसिद्ध झाले होते । दर्शनास झुंडीने भक्त येत होते। याच मठात ।।२।।

 

इथल्या लोकभारती” प्रमुख शिष्याने खटपट केली ।

निजमापर्यंत जाऊन कारवाई केली । निजामाकडून ब्रह्मान्ड नायकांच्या नावाने आठ गावांची सनद प्राप्त केली ।

यामुळे मठाची परिस्थिती सुधारली ।।३।।

 

एकदा राजूरकर मंडळी पंढरपुरी गेली । पावसाने भीमा नदी

भरून गेलेली । तीरावर भक्त मंडळी थांबली । पैलतीरी जाण्यासाठी ।।४ ।।

 

वारकऱ्यांनी थक्क करणारे दृश्य पाहिले । एक यती मूर्ती

जलपृष्ठावरून चालत येतांना दिसले। राजूरकरांना हेच यती

चंचलभारती दिसले । त्यांना विचारले स्वामी,इकडे कसे आले ? ।।५ ।।

 

जेंव्हा राजूरला सारे परतले । स्वामींना पंढरपुरी आम्ही स्वामींना पाहिले । वृत्त सर्वांना सांगितले ।।६।।

 

मठातील लोक म्हणाले । तुम्हाला असेच आहे वाटले ।

स्वामी तर मठ सोडून कुठेच नाही गेले । आमच्या सोबतच आहेत ते तर ।। ७ ।।

***********************

करी क्रमशः हे लेखन कवी अरुणदास

___________________________

कवी अरुणदास ” अरुण वि.देशपांडे पुणे

___________________________

प्रतिक्रिया व्यक्त करा