*जागतिक साहित्य कला व्यक्तित्व विकास मंचचे सन्मा सदस्य कवी अरुण वि देशपांडे लिखित अप्रतिम काव्यरचना*
।। श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ ।।
__________________________
श्री स्वामी समर्थ काव्यवंदना काव्यपुष्प – २८ वे
__________________________
लिहिती राहो माझी लेखणी । नित्य घडावी सेवा हातुनी ।
ही मागणी तव चरणी । सद्गुरू स्वामी समर्था ।। १ ।।
श्री दत्तप्रभूंचे प्रिय स्थान । असे गिरनार पर्वत ठिकाण ।
योगी-मुनी ,साधू -संत महान । करिती येथे जप-तप, अनुष्ठान ।।२ ।।
या गिरनार पर्वतावर । आले, ब्रम्हांडनायक स्वामी संचारेश्वर। करिती कृपा श्रीगुरूवर। आपल्या भक्तांवर।।३।।
जन्मजात जो पांगळा-गणेशपुरी । वास करीतसे गिरिनारी।
ईच्छा प्रबळ त्याच्या अंतरी । व्हावे दर्शन दत्तप्रभूंचे ।।४।।
गणेशपुरीचा विश्वास स्वामींवर । प्रार्थना करी तो वरचेवर। तुम्हीच माझे परमेश्वर । घडवावे मज दत्तदर्शन ।।५।।
जमलेले दुर्जन-ढोंगी हसती गणेशपुरीवर। म्हणे, नको ठेऊस
विश्वास तू या जोगड्यावर ।या पोटभऱ्या साधुवार । नाही आमुचा विश्वास रे ।। ६ ।।
भक्त-गणेशपुरीचा पाहून विश्वास । स्वामी करिती कृपा खास । पुरवी त्याच्या मनीची आस । घडवीती त्यास श्री दर्शन ।।७।।
जमलेले दुर्जन वरमले । स्वामींना शरण आले । क्षमा मागते झाले । श्री स्वामींची ।। ८ ।।
स्वामीनी त्यांच्यावर कृपा केली । म्हणाले -निंदानालस्ती तुम्ही रे खूप केली । ही वृत्ती पाहिजे सोडली । यात असे रे कल्याण तुमचे ।। ९ ।।
__________________________
करी क्रमशः हे लेखन कवी अरुणदास
___________________________
कवी अरुणदास – अरुण वि. देशपांडे- पुणे.
___________________________