*जागतिक साहित्य कला व्यक्तित्व विकास मंचचे सन्मा सदस्य तथा संस्थापक अध्यक्ष महाकवी कालिदास प्रतिष्ठान पुणे लेखक कवी वि ग सातपुते लिखित अप्रतिम काव्यरचना*
*ऋतुरंगले*
**********
कसे हरवले दिवस सारे
मज कळले कधीच नाही
ऊन्हे कोवळी पांघरताना
सांजाळलेले कळले नाही
ऋतुरंगले पाहता सोहळे
तुला कधी विसरलो नाही
मनगाभारी तुझेच आठव
कधी क्षणभर सरले नाही
तू अंतरीची अभिसारिका
मी कशासही भुललो नाही
प्रीतभावनांची सात्विकता
कधी उरी कोमेजली नाही
*********************
*वि.ग.सातपुते. ( भावकवी )*
📞 ( 9766544908 )