You are currently viewing स्मृति भाग १४

स्मृति भाग १४

*जागतिक साहित्य कला व्यक्तीत्व विकास मंचाचे सन्माननीय सदस्य कविवर्य वैद्यराज भूपाल त्र्यंबक देशमुख लिखित अप्रतिम लेख*

*स्मृति भाग १४*

समग्र भारत वर्षातील वेदविदांस मी कविवर्य वैद्यराज भूपाल त्र्यंबक देशमुखचा सविनय , सादर , साष्टांग प्रणिपात .
मी या आगोदर एक श्लोक दिला होता की , ” आत्महत्या हे पाप आहे ” या विषयीचा . आज तसाच सुंदर श्लोक ऋषि पराशरांनी दिलेला .

*अतिमानादतिक्रोधात् स्नेहाद्वा यदि वा भयात् ।*
*उद्बध्नीयात् स्त्री पुमान् वा गतिरेषा विधीयते ॥*

*पूयशोणितसंपूर्णे अन्धे तमसि मज्जति ।*
*षष्टिं वर्षसहस्त्राणि नरकं प्रतिपद्यते ॥*
अति मानामुळे , अति क्रोधामुळे , स्नेहकारणाने ( प्रेमामुळे ) अथवा भयामुळे जर कुणीही स्त्री वा पुरुष स्वतःस फाशी लावून घेत असेल तर त्याची ही गति होते .👇
अशी स्त्री वा पुरुष पू आणि रक्त यांनी भरलेल्या घोर अंधकारात गोते खातो . तसेच साठहजार वर्षांपर्यंत नरकात पडतो .
यात नरक , रक्त व पू यांचा घोर अंधकार , हे शब्द आधिभौतिकवाद्यांच्या मनात संशय निर्माण करणारे आहेत ! सर्वप्रथम एक गोष्ट लक्षात येते ती ही की आत्महत्या माझ्या संस्कृतीला मान्य नाही . दुसरे असे की आत्महत्येबद्दल भीती निर्माण व्हावी म्हणून दुसरा श्लोक असावा ! एवढे मानले अक्कलवंतांनी ! तरी चालेल . ज्यांची बुद्धि असते त्यांचा अभ्यास वेगळा असतो अक्कलवंतांपेक्षा ! पण मी मानतो ऋषि जे लिहीतात ते . भले भारतातले राजकारणी कितीही ओरडोत स्मृतींचे नावाने !🙏🙏 पृथ्वीचा गोल घेतला आणि त्यावर भारताचे मध्यातून एक सळई टाकली तर ती थेट विरुद्ध बाजूला मेक्सिकोमधे निघते . तो एकवीसाव्वा नरक त्या काळात गणला जायचा . ज्याला पुराणात *मक्षिका देश* म्हणून संबोधले होते . अहि रावण व महि रावण हे इथलेच ! येथपर्यंत सुग्रीवाने आपले हेर सीतामातेच्या शोधासाठी पाठवले होते ! आता भारताचे पश्चिम दिशेने मेक्सिकोपर्यंत देश मोजा व तेथे कशा प्रकारचा आतंक आहे , त्याची गणना नरक यातना म्हणूनच करावी ना ?
एवढ्या पाच वर्षात जसा आयुर्वेद वृद्ध होतोय तसे एक सहज औषध पुढे आले ” सुवर्णप्राशन विधी ” . यात जन्माला आलेल्या मुलाला सोनं चाटवायचं . काय होतो याचा उपयोग ! मी लहान असतांना प.पू. भिषग्वर सर्वश्री वेणीमाधवशास्त्री जोशी व माझे आजोबा यांचे संभाषणातला अंश सांगतो . ” भाऊसाहेब , सुवर्ण चाटणारा मुलगा कधीच आत्महत्येचा विचार करत नाही . उलट ज्याला आत्महत्या करावीशी वाटते त्यास सुवर्ण द्यावे , तो विचार सोडून देईल आत्महत्येचा ! ” . हे त्यांनी सांगितलेले माझ्या अजून लक्षात आहे . पण ते ही आयुर्वेदीय वक्तव्य भिषगाचार्य ऋषिवरांचेच ! ( ते ३०x पोटेन्सीचे होमिओपॅथीचे लिक्वीड सुवर्णमात्रा म्हणून वापरायचे ). आता तर खात्री होईल ना माझ्या संस्कृतीतच प्रयत्न केले गेले माणूस विनाकारण मरु नये म्हणून ! आणि ते ही स्मृति लिहिणारे वा आयुर्वेद लिहिणार्‍या ऋषिंकडून ! त्यांनी दिलेल्या ह्या दानाने आम्ही तृप्त होवून त्यांची आठवण म्हणून तर्पण न केले तर आम्ही पशूच ना ! पण त्याही पेक्षा हीन उपमा हवी ! कारण देणार्‍याची आठवण पशुसुध्दा ठेवतात हो ! आम्ही याच जन्मात विसरतो . आज कोरोनाचे संकट सर्व जगात पसरले आहे . त्यात विनाकारण कुणी मृत्युमुखी पडू नये म्हणून जे पोलीस , वैद्यकीय कर्मचारी , सफाई कर्मचारी आणि पत्रकार बांधव स्वतःचा जीव धोक्यात घालून काम करत आहेत , त्यांनाच आजचा लेख समर्पित करतो .💐💐 आणि थांबतो .
विनंती इतकीच , पराशर स्मृति वाचनीय आहे . उद्या काही श्लोक पाहू .
🙏🙏
इत्यलम् ।
🙏🙏🚩🚩🙏🙏🚩🚩
लेखनधर्म—कविवर्य वैद्यराज भूपाल त्र्यंबक देशमुख .
पिंपळनेर ( धुळे ) ४२४३०६
९८२३२१९५५०/८८८८२५२२११
🙏🌹🙏🌹🙏🌹🙏🌹🙏🌹🙏🌹

प्रतिक्रिया व्यक्त करा

1 × 5 =