You are currently viewing आत्महत्या—७
  • Post category:लेख
  • Post comments:0 Comments

आत्महत्या—७

*जागतिक साहित्य कला व्यक्तित्व विकास मंचचे सन्माननीय सदस्य कविवर्य वैद्यराज भूपाल त्र्यंबक देशमुख लिखित अप्रतिम लेख*

*आत्महत्या—७*

भारतीय स्त्रिया आत्महत्या करण्यामागे अनेक कारणांपैकी हे पुढे दिलेले एक कारण तर नसावे?? ज्यांना आम्ही अहिंसेचे जनक मानतो , त्यांनी दिलेली उत्तरे ऐकली की मन स्तब्ध होते ! सुन्न होते !! मग असा सहज प्रश्न पडतो की ” भगवान महावीरांची अहिंसा योग्य का भगवान बुद्धांची योग्य का महात्मा (!) गांधींची योग्य ? आणि पाश्चिमात राजकारण्यांनी गांधींनाका महत्व दिले ? तर भारत त्या अहिंसेच्या दबावाखाली हतबल व्हावा म्हणून? केवढा धूर्तपणा ! आणि पाश्चिमात्यांची वाह वा! करणारे आमचे राजकारणी !!! कठीणआहे सगळं!! सिंहासनावर सिंहाऐवजी लांडगे , कोल्हे , कुत्रे , गाढवं बसली तर वनाचे काय हाल होतील ? तेच घडतंय का आमच्या भारतात ?? वाचावे पुढे कृपया . आज मला आलेली पोस्ट आहे .
पूर्व बंगालच्या स्त्रियांनी गांधीजींना विचारले कि, “गुंडांनी आमच्यावर हात टाकला तर आम्ही काय करायचे ?
गांधीजी म्हणाले, “श्वास रोखून धरा म्हणजे तुमचा प्राण जाईल आणि आब्रु वाचेल…”
डॉक्टरांनी सांगितले कि. “श्वास रोखून प्राण जाणार नाही. स्त्री बेशुद्ध होईल आणि गुंडांचे दुष्ट कार्य झाल्यावर ती शुद्धीवर येईल.”
तेव्हा गांधीजी म्हणाले, “विषाची कुपी स्त्रियांनी जवळ बाळगावी. अहिंसेच्या अतिरेकाची हि तिरस्करणीय पराकाष्ठा आहे.”
स्त्रियांनी विष खाऊन मरावे आणि गुंडांवर मात्र सूड घेण्यात येऊ नये हे जर गांधीजींच्या अहिंसेचे भयानक तत्त्वज्ञान असेल, तर आग लागो रे त्या गांधीजींच्या अहिंसेला…!!!
गांधींजींच्या अहिंसेमधून निर्माण झालेल्या भ्याडपणामुळे आणि भेकडपणामुळे ह्या महान देशाचे तुकडे तुकडे झाले.

– *आचार्य अत्रे*
(कऱ्हेचे पाणी – खंड ४ पान नं. ९०) इत्यलम् । भाग ८ नंतर येईलच !

🙏🙏 🙏🙏
लेखनधर्म—कविवर्य वैद्यराज भूपाल त्र्यंबक देशमुख.
पिंपळनेर (धुळे)४२४३०६
९८२३२१९५५०/८८८८२५२२११
🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩

प्रतिक्रिया व्यक्त करा