*ज्येष्ठ कवी मोहन मराठे लिखित अप्रतिम काव्यरचना*
*” गिधाडे “*
वेशीवरती “संकट रुपी ”
झडप घालण्या सज्ज “गिधाडे”
माता – भगिनी बिथरुन गेल्या
भविष्याला ही प्रश्न पडे. / १/
सात्त्विक, सनातनी या भूमीवर
अंधारुन आले काळे मेघ
सैतान उभा हा, पसरुन बाहू
परिस्थिती चा घेण्या “वेध” /२/
परसत्तेची, परतंत्राची
होऊ घातली “नांदी ”
धूर्त,धोरणी,राजकारणी
करुनी घेती “चांदी”. /३/
कुठे जात,तर !कुठे धर्म तर,
देवादिकांची खिल्ली
यश -अपयशाची यांच्या आहे
जनते हाती “किल्ली “. /४/
“धर्मयुद्ध” अन् “प्रेमयुद्धाचे”
” अनर्थ युद्ध” हे परिणाम
नाजुक”कळ्या “फुलण्याआधी
कुस्करण्या येती”अधम” /५/
असंख्य “सवाल”मातृभूमी चे
उभे आज ठाकले
जुन्या जाणत्या “सम्राटांनी”
गड पाहिजेत राखले. /६/
रचना:— मोहन मराठे…..
