*ज्येष्ठ लेखिका कवयित्री वैशाली अभिजीत न्यायनिर्गुणे लिखित भावस्पर्शी रचना*
*आपल्याला मात्र मरावं लागतं*
मलाही प्रश्न पडला… जिवंतपणी माझी कोणालाच काही किंमत नव्हती l
मी केलेल्या कर्तुत्वाची कोणालाही जाणीव नव्हती l
मग ठरवलं काहीतरी करून दाखवायचं l
माझं नाव जगासमोर यायला स्वतःला आता झोकून द्यायचं ll
मग मी विचार केला.. जनतेसाठी मी केल्या चाकऱ्या l
मिळाल्या त्यांना पोटभर भाकऱ्या l
वाटलं कुठेतरी मी कमी पडलोय l
जनतेस काहीतरी देण्याचे मी उरलोय ll
पण नंतर मग उमगलं… स्वतःबद्दलची स्तुती ऐकायलाही आपला प्राण गेलेला लागतो l
केलेल्या कर्तुत्वाची माहिती कळायलाही
आपल्याला मात्र मरावं लागतं ll
मग मात्र दिवस पालटतो… मेलेला दिवस खूप महत्त्वाचा वाटतो
मित्र शत्रू सगळे एकत्र येतात
सगळेजण मग आपली स्तुती करत असतात l
टीव्हीवर मग आपलीच बातमी l
दोन-तीन दिवस असते मजाच पत्रकारांची ll
लोकांचाही पहा कसं असतं… जिवंत असताना कोणीही आपली करत नाही स्तूती l
चांगले काम केले तरी
समजतात आपणास दोषी l
जीव गेल्यावर मग लागते रांगच रांग l
चांगली होती ती व्यक्ती असा देतात सगळेच राग ll
किती असते ते दुर्भाग्य आपलं…जेव्हा जनता एक होऊन
आपल्या नावाने काहीतरी अर्पण करते l
त्याचा आनंदही आपण घेऊ शकत नाही l
मेल्यावरच का त्याचं महत्त्व पटतं हे मात्र कळत नाही ll
वाटते विचारायला मग… जिवंत असताना काय तुम्हाला लाज वाटते की काय ?
दाद द्यायलाही स्तुतीबद्दल जीभ झडते की काय ?
म्हणूनच आता असं वाटतं …आता तरी जागे व्हा
जिवंतपणे द्यायला मान l
लागा आता कामाला
ज्यांचं आहे भरपूर नाव ll
किती लाजिरवाणी गोष्ट आहे …
आपण आपला बहुमान स्वीकारायलाही आपल्याला मात्र मारावे लागतं l
लोकांना कळायला आपले कर्तुत्व आपले जीव प्राण आपण हरवलेलं असतं !!
वैशाली अभिजीत न्यायनिर्गुणे, मुलुंड पूर्व,
810 838 1524
