You are currently viewing मी साहेबांमध्ये देव पहिला..

मी साहेबांमध्ये देव पहिला..

*मी साहेबांमध्ये देव पहिला*,,,,,,,,,,,,,

आमचे आराध्यदैवत, कोकणचे भाग्यविधाते, आदरणीय राणे साहेबांचा आज वाढदिवस,,,,,,,,,,,,

हया राज्यातील स्वाभिमानी नेतृत्व, ज्यांनी स्वतःच्या कर्तृत्वाने महाराष्ट्राच्या राजकारणावर स्वतःची वेगळी ओळख निर्माण केली,,,,आयुष्यभर त्यांनी ह्या खडतर प्रवासात एक तत्व जोपासले व मान्यही केले ते म्हणजे माणसाने *” महत्वाकांक्षी*” असावे आणि मी महत्वकांक्षी आहे,,,, *”एखादी गोष्ट मिळवण्याची जिद्द आणि धमक माझ्यात आहे “* हे स्पष्ट मत त्यांचेच आहे,,,,,,,,,,,

*राणे साहेब* हे एक वादळी व्यक्तिमत्त्व आहे आणि स्वतःच्या निर्णयावर ठाम असणारे राजकीय नेते आहेत,प्रवाहाच्या विरुद्ध जाऊन अस्तित्व निर्माण करणारे मोजकेच असतात,,,,,,,,,,,काँग्रेस चा राजीनामा दिल्यानंतर राणे राजकारणातून संपले असे अनेकांना वाटत होते,अनेकांना त्यात आनंद हि मिळत होता,परंतु राजकारणात असे निर्णय परिस्थिती नुसार घ्यावे लागतात,त्यावर टीकाटिप्पणी होते,पण सर्वच निर्णयांचे सर्वाना स्पष्टीकरण देता येत नाही,,,,,,,,राजकारणात कुणीही कधीही संपत नाही,ज्याच्यात धमक असते,निर्णय क्षमता असते,राजकीय व प्रशासकीय अभ्यास असतो तो नेता कधीही मागे वळुन पहात नाहीत त्यातील अग्रगण्य नाव म्हणजेच *मा,राणे साहेब*,,,,,,,

राणे साहेबांनी कधीही पदांचा पाठलाग केला नाही,,,प्रत्येक पदे हि राणे साहेबांचा पाठलाग करत साहेबांच्या पदरी पडली आहेत,,,,,त्यासाठी त्यांची लोकांप्रती प्रचंड निष्ठा,,,,प्रचंड अभ्यास,,, निर्णय क्षमता,,,,, कठोर परिश्रम करण्याची क्षमता,,,,कोणतेही राजकीय संकट यशस्वीपणे हाताळण्याची हातोटी,,,,, स्पष्टवक्तेपणा, दिलेला क्षब्द कोणत्याही परिस्थितीत पाळणे,,,,,,अशा नेतृत्व गुणां मुळे प्रत्येक पद हे साहेबांचा पाठलाग करत आलेले आहे,,,,,,,आजपर्यंतच्या राजकिय इतिहासात पदांमुळे माणसे नावारूपाला आलेली आपण पहात आलोय,,,,,,पण *नारायणराव राणे* हे असे एकमेव व्यक्तिमत्त्व आहे कि ज्यांच्यामुळे त्या पदाची शान वाढलेली आहे,,,त्या पदांना दर्जा प्राप्त झालेला आहे,,,,,,,,,साहेबांचे कष्ट,,त्याग,,संघर्ष,,प्रामाणिकपणा, प्रचंड आहे,,,, *म्हणूनच साहेब आज केन्द्रात मंत्री आहेत*!!!!!!

हया महाराष्ट्राला मा,यशवंतराव चव्हाण, मा वसंतदादा पाटील,, मा,शरदराव पवार यांचा वारसा लाभलेला आहे आणि त्याच पंक्तीत मा,नारायणराव राणे साहेबांचे स्थान आहे,,,,,,मा,राणे साहेब हे कोकण चे वैभव व महाराष्ट्राची शान आहे,,,,स्वतःच्या भागा बद्द्ल एव्हडे प्रेम व तळमळ असणारा दुसरा नेता नाही,,साहेबां सोबत कार्यकर्ता म्हणून काम करताना, *नेतृत्व, कर्तृत्व व दातृत्व* काय असते ते आम्ही अनुभवत आहोत,, साहेबांची विकासाची,व्याख्या फार वेगळी आहे,,रस्ते,वीज,पाणी,हया गोष्टी होतच रहाणार,,पण माझ्या कोकणातील जनता आर्थिक सक्षम झाली पाहिजे हा ध्यास साहेबांनी व संपूर्ण राणे कुटुंबीयांनी घेतलेला आहे,सतत जनकल्याणासाठी झटणारे हे कुटुंब पाहिल्यावर असे वाटते की परमेश्वराने यांचा जन्म फक्त आणि फक्त गोरगरिबांच्या उद्धारासाठी च दिला आहे,,,,,,,,मी अनेक सभा समारंभात साहेबांचा उल्लेख माणसातील *देव* असा करतो अनेकांनी माझ्यावर टिका सुद्धा केली,,,परंतु मंदिरातील पाषाणातील देव पण धाऊन येण्या अगोदर,,गरीबाच्या, दिन दुबळ्या च्या हाकेला हा *माणसातील देव* सर्व प्रथम धाऊन येतो हे आम्ही अनुभवतो आहोत,,,,,,

कोकणातील गरीब शेतकऱ्यांची मुले शिकावीत आर्थिक सक्षम व्हावीत म्हणून साहेबांनी सिंधुदुर्ग जिल्ह्यात शैक्षणिक क्रांती घडवली,इंजिनिअरिंग कॉलेज, कृषी कॉलेज, डेरी कॉलेज,, महिलांसाठी जिजाऊ महिला भवन,,,,,तसेच शासनाकडून कोणतेही अनुदान अथवा जमीन न घेता स्वतःच्या खिशातून शेकडो कोटी खर्च करून कोकणचा मानबिंदू ठरणारे असे सुसज्ज हॉस्पिटल व मेडिकल कॉलेज उभे केले आज सिधुदुर्ग सारख्या तळकोकणातील जनतेला आंतरराष्ट्रीय दर्जाच्या वैद्यकीय सुविधा निर्माण केल्या तसेच कोकणातील व इतर राज्यातील तरुण तरूणी उच्च दर्जाचे वैद्यकीय शिक्षण घेत आहेत,,,,,,,हे कॉलेज उभे करण्यासाठी मा,साहेब व मा,वहिनी साहेब यांनी जी प्रचंड मेहनत घेतली ,,दिवसांचे 18/18 तास हया दाम्पत्याने कॉलेज साठी कष्ट उपसले आहेत,,,,त्याचे आम्ही साक्षीदार आहोत,,,,,,,,फक्त एकच ध्येय होते,,,, माझ्या गरीब बांधवांना उच्च दर्जाची वैद्यकीय सेवा मिळाली पाहिजे,,, हेच उद्दिष्ट ठेऊन हे कुटुंब अहोरात्र काम करत आहे,,मा,साहेबांनी व राणे कुटुंबीयांनी हया कोकणातील हजारो संसार उभे केले,अनेक तरुणांना, दिन दुबळ्या ना आर्थिक पाठबळ दिले,,कोकण समृद्ध बनवले व कोकणला अशा उंचीवर नेऊन ठेवले की संपूर्ण महाराष्ट्राचा कोकणा कडे बघण्याचा दृष्टिकोन बदलुन टाकला,,,,आणि हया सर्व प्रवासात आदरणीय सौ वहिनी साहेब व निलेशजी आणि नितेशजी ची साहेबांना खंबीर साथ लाभली,,,,,,,,,,,,

राजकारणात चढ उतार हे नेहमीच येत असतात,अनेक नेत्यांच्या आयुष्यात, देवादिकांच्या, साधुसंतांच्या जीवनात सुध्दा चढ उतार आले,,, मधल्या काळात साहेबांच्या राजकीय जीवनात पण हे दिवस आलेत पण साहेब कधीच खचले नाहीत उलट आम्हा खचलेल्या कार्यकर्त्यां मध्ये आत्मविश्वास भरून कामाला लावले,,,,,,

*मा,राणे साहेबांच्या पाठी परमेश्वराचे आशीर्वाद आहेत,,,म्हणूनच मा,राणे साहेब आज केंद्रीय मंत्री आहेत*,,,*आज साहेब आपल्या राजकीय कारकिर्दीच्या अत्युच्च शिखरावर आहेत*,,,हा आम्हा कोंकणी माणसांचा तसेच महाराष्ट्रातील जनतेचा सन्मान आहे,,,,,,,आज खऱ्या अर्थाने दिल्ली कोकणी माणसाच्या उंबरठ्यावर आली,,,एवढा सन्मान साहेबांनी कोकणी माणसाला दिला,,,,,,जे केंद्रीय खाते कुणाला माहिती नव्हते त्या खत्याचा गौरव मा,साहेबांमुळे आज देशात होतोय,,,,,,साहेब केंद्रातील महत्वाच्या पहिल्या पाच मंत्र्यामध्ये आहेत हाच महाराष्ट्राचा सन्मान आहे !!!!!

अशा ह्या आमच्या लोकनेत्या चा वाढदिवस म्हणजेच कोकणी माणसांचा आनंदोत्सव असतो

आजच्या हया शुभदिनी आदरणीय

*साहेबांच्या वाढदिवसानिमित्त त्यांना दीर्घ आयुष्य उत्तम आरोग्य देऊन त्यांच्या मोहरणाऱ्या पावलांना नेहमी लख्ख उजेडाची वाट लाभो* *व त्यांच्या सर्वं मनोकामना पूर्ण होवोत हिच परमेश्वराच्या चरणी प्रार्थना*,,,,,🙏🏻

*शुभेछुक : संदिप कुडतरकर आणि कुटुंबीय* *सावंतवाडी सिंधुदुर्ग* 🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹

प्रतिक्रिया व्यक्त करा