आरोंदा गावात भटक्या कुत्र्यांचा वावर वाढला असून या मोकाट कुत्र्यांनी उच्छाद मांडला आहे. कुत्र्यांच्या टोळ्या एकट्या दुकट्या माणसाचा, बाईकस्वाराचा लांब अंतरापर्यंत जीवघेणा पाठलाग करतात. वाहन चालकांच्या मागे धावल्या मुळे वाहन चालकांचा अपघात होण्याची शक्यता ही नाकारता येत नाही. तसेच हि मोकाट कुत्री कळपाने फिरत असल्याने पादचाऱ्यांना धोकादायक झाले आहे. तसेच चालत ये जा करणाऱ्या माणसांच्या ही मागे लागतात. त्याचा चावा हि घेतात. त्यामुळे नागरिकांवर हल्ला करण्याचे प्रकार घडत असल्याने घबराट वाढली आहे. ह्या भटक्या कुत्र्यांचा लवकरात लवकर बंदोबस्त करण्यात यावा अशी मागणी आरोंंदा मधिल नागरीकांचि मोठ्या प्रमाणात मागणी होत आहे.

आरोंद्यात भटक्या कुत्र्यांचा उच्छाद
- Post published:मार्च 23, 2022
- Post category:बातम्या / विशेष / सावंतवाडी
- Post comments:0 Comments
You Might Also Like

उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उद्या सिंधुदुर्ग जिल्हा दौऱ्यावर

सिंधुदुर्ग जिल्ह्यातील सर्व मत्स्य सोसायटी यांना डिझेलचा परतावा दिल्याबद्दल मा. सुधीर मुनगंटीवार मत्स्य मंत्री महाराष्ट्र यांना धन्यवाद….

कुडाळ येथे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या जीवनपटावरील छायाचित्र प्रदर्शनाचे उद्घाटन
