You are currently viewing कहाणी

कहाणी

जागतिक साहित्य कला व्यक्तित्व विकास मंचचे ज्येष्ठ सदस्य लेखक कवी श्री अरविंदजी ढवळीकर यांची काव्यरचना

साधीच हि कहाणी सोपेच नाव होते
कुठलेही पान उलटा नवखेच भाव होते

कांही मिळून गेली कांही जुळून आली
नातीच ना ती सुखाचे सारे पडावं होते

वस्तीत या सुखाच्या कांही भरावं होते
कोठे उतार नव्हता सारे चढाव होते

थकलोच शोधताना गर्दीत माणसांच्या
माणूस कुठे नव्हता सगळे जमाव होते

व्यवहार भावनांचे दिसलें घरोघरी त्या
कोठे प्रभाव होते तर कोठे उठाव होते

मंदिर पहिले मी आरास भव्य दिसली
श्रद्धेविना पुजारी अन नुसते ठराव होते

जे भेटले कुणी मज भलतेच साव होते
कुणी रंक राव कोणी फसवे बनाव होते

कहाणीत वाचले ते परिचीत वाटले पण
कळले अखेर मजला ते माझेच गाव होते

अरविंद
6/7/21

प्रतिक्रिया व्यक्त करा