*जागतिक साहित्य कला व्यक्तित्व विकास मंचचे सन्मा सदस्य ज्येष्ठ लेखक कवी अरुण वि देशपांडे लिखित अप्रतिम काव्यरचना*
।। गण गण गणात बोते ।। जय गजानन श्री गजानन ।।
__________________________
श्री गजानन विजय काव्यांजली काव्यपुष्प- ११९ वे
अध्याय – १९ वा , कविता- ११ वी
___________________________
अध्याय हा एकोणवीसावा । सार यातला जाणावा । स्वामी-बोल समजुनी घ्यावा । निजकल्याणासाठी ।।१।।
श्रावणमास आला । स्वामींच्या प्रकृतीत बदल झाला ।
आषाढात सर्वांना तो दिसला । जन चिंतीत झाले ।।२।।
दिवस तो गणेश चतुर्थीचा । भक्तांसी संवाद स्वामींचा ।
दिवस उद्याचा । गणपती बोळवण्याचा ।।३।।
पार्थिव गणपती करोनी । पूजा-अर्चा त्याची करोनी ।
त्यास नैवद्य दाखवोनी ।बोळवावे जलात दुसरे दिवशी ।।४।।
जसे वस्त्रास बदलणे । तसेचअसे देह-वस्त्र सोडणे ।
नवे नसे हे घडणे । थोर सारे देहवस्त्रास बदलती ।।५ ।।
भक्तांना स्वामी बोलती । आम्ही कुठे ना जाती ।तुम्हास
संभाळण्या प्रती । असुत स्थित इथे ।।६ ।।
मी गेलो ऐसें मानू नका । भक्तीत अंतर पाडू नका ।
मज विसरू नका । आहे मी इथेच ।।७ ।।
******
करी क्रमशः हे लेखन कवी अरुणदास
___________________________
कवी अरुणदास ” अरुण वि.देशपांडे- पुणे.
___________________________

