*जागतिक साहित्य कला व्यक्तित्व विकास मंचचे सन्मा सदस्य ज्येष्ठ लेखक कवी श्रीनिवास गडकरी लिखित अप्रतिम बालकविता*
*विरामचिन्हे ( बाल कविता )*
अर्थपूर्णतेची झूल
शब्दांनी पांघरली
त्यासाठी भाषेत
विरामचिन्हे अवतरली
स्वल्प आणि अर्धविराम
वाक्ये तोडतात ( , )
संयोग चिन्ह मात्र
दोन शब्द जोडतात ( – )
भाव दर्शविण्यासाठी
वेगळी चिन्हे वापरतात
उद्गार किंवा प्रश्न
खुणेतून उभे करतात
उभा दंड व्यक्त करतो
आश्चर्य अन उदगार (! )
प्रश्नचिन्ह राहते
कायम यादगार (? )
संवादासाठी येते
चिन्ह अवतरण ( ” )
कंस स्पष्ट करतो
शब्दांचे स्पष्टीकरण ( )
काकपद,अवग्रह (SS)
अपसरण( -) आणि संयोग (—)
आता कुठे दिसण्याचा
फारसा येत नाही योग
अर्थपूर्ण चिन्हे हीं सारी
परकीयांकडून उचलली
समृद्ध करत भाषेला
या लिपीत मिसळली
श्रीनिवास गडकरी
रोहा पेण पुणे
@ सर्व हक्क सुरक्षित
केवळ नावासहितच पुढे पाठवावे
