*जागतिक साहित्य कला व्यक्तित्व विकास मंचचे सन्मा सदस्य ज्येष्ठ लेखक कवी अरुण वि देशपांडे लिखित अप्रतिम काव्यरचना*
।। जय गजानन श्री गजानन ।।।। गण गण गणात बोते ।।
__________________________
श्री गजानन विजय काव्यांजली काव्यपुष्प – १११ वे.
अध्याय – १९ वा , कविता – ३ री
___________________________
बुटीला स्वामी बोलले । म्हणाले , तू मला इथेच ठेवून घेतले।
हे तुझे चुकले । जाऊ दे मज शेगावा ।। १।।
समर्थांचे हे सांगणे । ना ऐकिले बुटीने । राहती स्वामी बळजबरीने । बुटीच्या वाड्यात ।।२।।
हरी पाटील शेगावाहून निघाले । आगगाडीत बसले ।
स्वामी बुटीस म्हणाले । जाऊ दे मला ईथुनी ।।३।।
तुझ्या उड्या धनाच्या जोरावर । नाही हे बरोबर । हरी पाटील इथे आल्यावर । नेईल मला मनगटाच्या बळावर ।।४।।
बुटीच्या वाड्यात पंगत बसली खरी । थाटमाट त्याचा भारी । मध्यभागी आसनावरी । बैसली स्वामींची स्वारी ।।५।।
विदर्भ कुबेर ” बुटीस म्हणती । पाहुनी त्याची श्रीमंती ।
परी गर्व भारी त्याच्या चित्ती । प्रदर्शन तो करी ।।६।।
हरी पाटील आले । सदन द्वारी त्यास रोकिले । बाहेरच थांबविले । बुटीच्या शिपायाने ।।७।।
पाटलांनी त्यास ना जुमानले । ते सदनात आले । पाटलास पाहुनी स्वामी धावले । चाल हरी शेगावासी, स्वामी म्हणाले ।।८।।
************
करी क्रमशः हे लेखन कवी अरुणदास ।।
__________________________
कवी अरुणदास ” अरुण वि.देशपांडे- पुणे.
___________________________

