*जागतिक साहित्य कला व्यक्तित्व विकास मंचचे सन्मा. सदस्य लेखक कवी अरुण वि. देशपांडे लिखित अप्रतिम काव्यरचना*
।। गण गण गणात बोते ।। जय गजानन श्री गजानन ।।___________________________
श्री गजानन विजय काव्यांजली काव्यपुष्प – १०९ वे
अध्याय – १९ वा , कविता – १ ली
___________________________
अध्याय एकोणवीसवा आरंभ आहे ।श्री गजानन लीला वर्णितो आहे । मनात अपार आनंद आहे । ही लेखन सेवा
करतांना ।। १ ।।
महाराज शेगावी असतांना । भक्त एक आला दर्शना ।
स्वामींच्या वंदावे चरणा । असे हीच त्याची कामना ।।२ ।।
गर्दे काशिनाथ त्याचे नाव । मनी मोठा भक्ती भाव । साधा सरळ स्वभाव । म्हणे तो, दर्शने झालो धन्य मी ।।३ ।।
काशीनाथाच्या पाठीस भली । कोपरखळी मारिली ।
समर्थांची कृपा झाली । म्हणे, जा,तुझा हेतू पुरला,वाट पाहे तारवाला ।। ४।।
काशीनाथपंत खामगावी आला । तो त्यास दिसला । दारात उभा तारवाला । नेमणूक मजकूर वाचला त्याने ।।५।।
स्वामींच्या शब्दातले गूढ कळले। स्वामींनी अंतरज्ञानाने जाणले । पंतांनी स्मरण केले। स्वामी गजाननाचे ।। ६।।
एकदा स्वामी नागपुरा आले । गोपाळ बुटीकडे उतरले ।
सदन हे अति भव्य भले । या वाड्यात स्वामींना जणू बुटीने
कोंडीले ।।७।।
*********************
करी क्रमशः हे लेखन कवी अरुणदास ।।
___________________________
कवी अरुणदास – अरुण वि.देशपांडे -पुणे
___________________________

