*जागतिक साहित्य कला व्यक्तित्व विकास मंचचे सन्मा सदस्य कवी अरुण वि देशपांडे लिखित अप्रतिम काव्यरचना*
।। गण गण गणात बोते ।। जय गजानन श्री गजानन ।।
__________________________
श्री गजानन विजय काव्यांजली काव्यपुष्प – १०३ वे
अध्याय – १८ वा , कविता- १ ली
___________________________
श्री गणेशास वंदन । श्री सद्गुरूंना नमन । श्री कुलदेवतांना
स्मरून । करितो क्रमशः लेखन- अठराव्या अध्यायाचे ।।१।।
श्री गजानन स्वामींचा । उपदेश सर्व-कल्याणाचा । घ्यावा बोध याचा । भक्तजन हो तुम्ही ।। २।।
अठराव्या अध्यायात । होई सुरुवात । आरंभी कथा यात ।
स्वामींच्या दोन भक्तांची ।। ३ ।।
स्वामींच्या या भक्ताचे । बायजा नाव असे साचे ।मनो,काया,वाचे ।ही करी भक्ती समर्थांची ।। ४ ।।
मुंडगावीचे शिवराम, भुलाई । हे असे बायजेचे बाबा-आई ।
केली लहानपणीच बायजेच्या लग्नाची घाई । ही बायजा
जाहली तरुण ।। ५।।
शिवराम घेउनी गेला । बायजा-कन्येला । जावयाच्या घराला । गर्भधान करण्याप्रत ।। ६ ।।
शिवरामास वृत्त हे कळले । जामात त्याचे षंढ निघाले।
पोरीचे जीवन उध्वस्त झाले । होई अपार दुःख माता-पित्याला ७।।
बायजेची आई । भुलाई, करी घाई । बोले- काय हे विपरीत बाई । लावू लग्न दुसरे आपल्या पोरीचे ।। ८।।
**********
करी क्रमशः लेखन कवी- अरुणदास
___________________________
कवी- अरुणदास ” अरुण वि.देशपांडे- पुणे.
___________________________