*जागतिक साहित्य कला व्यक्तित्व विकास मंचचे सन्मा सदस्य कवी अरुण वि देशपांडे लिखित अप्रतिम काव्यरचना*
श्री गजानन विजय काव्यांजली काव्यपुष्प- ९८ वे
अध्याय- १७ वा , कविता – २ री
___________________________
शिष्य भास्कराने फार आग्रह केला । हट्ट नाही सोडला ।
स्टेशनावर घेउनी आला । स्वामींना, अकोल्याच्या ।।१।।
भास्कराने विनंती स्टेशन मास्तरांना केली । स्वतंत्र डब्याची व्यवस्था केली । सारी खटपट केली । भास्कराने, स्वामींना
मलकापूरी नेण्यासाठी ।। २ ।।
गाडी स्टेशनात आली । गोष्ट एक घडली । रिकाम्या डब्यात
नाही बसली । स्वामींची स्वारी ।। ३ ।।
योगीराज बसले जाऊन ज्या डब्यात । आधीच स्त्रिया बसलेल्या होत्या त्यात । स्वामीमुर्ती दिगंबर प्रत्यक्षात ।
घाबरून गेल्या स्त्रिया, देती खबर पोलिसात ।। ४ ।।
पोलीस आले । अधिकारी ही आले । स्वामींना बोलले।
महाराज नाही भ्याले । अधिकाराच्या बोलण्याला ।।५।।
स्टेशन मास्तर ही आले । त्यांनी आदरपूर्वक स्वामींना विनवले । कायद्याचे प्रयोजन पाहिजे जाणले । घडलेल्या प्रसंगाचे ।। ६।।
स्वामी डब्यातून उतरले । परी पुढे एक झाले । पोलिसांनी
त्यांचे काम केले । भरला खटला स्वामींवरती ।। ७ ।।
श्री स्वामींचे वागणे । कृतीतून त्यांचे सांगणे । समजुनी घेणे।
सार त्यातले ।।८।।
*******************
करी क्रमशः हे लेखन कवी अरुणदास
___________________________
कवी- अरुणदास – अरुण वि.देशपांडे- पुणे.
___________________________

