*जागतिक साहित्य कला व्यक्तित्व विकास मंचचे सन्मा सदस्य कवी अरुण वि. देशपांडे लिखित अप्रतिम काव्यरचना*
।।श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ ।।
।। श्री स्वामी समर्थ जयजय स्वामी समर्थ ।।
__________________________
श्री स्वामी समर्थ काव्य-वंदना काव्यपुष्प- १७ वे ।।
__________________________
भले करणे जमले नाही । काही हरकत नाही ।
विचार वाईट मनी येऊ नाही । एवढे करावे स्वामी हो ।।१ ।।
अर्थ असावा बोलण्यात । अनर्थ नको शब्दात । असू द्या
ध्यानात । भक्तजन तुम्ही हो ।। २ ।।
एक तरुण साधक होता । ईश्वर दर्शन हेतू मनात होता ।
दोन तपे हिमालयात फिरत होता । शोधात गुरूंच्या ।। ३ ।।
व्हावे शंका निरसन । सदा हेचि मनन । साधकाचे अस्थिर राही मन । सदा सर्वकाळ ।। ४ ।।
गुहेत आल्यावर । दिगंबराचार्यांना पाहिल्यावर । हर्ष झाला अनिवार । साधकाच्या मना ।५ ।।
दिगंबराचार्यांना पाहून । मनी त्याच्या पटली खूण । हेच करतील निरसन । माझ्या मनाचे ।। ६ ।।
स्वामी म्हणाले त्यास । आहे तुझा अभ्यास । तुज ज्ञानाचा आहे ध्यास । मिळेल यश वत्सा तुजला ।। ७ ।।
साधकाने नम्रतेने विचारले । स्वामी मज सांगावे भले ।
मी पाहिजे काय केले । भक्ती समजण्यासाठी ? ।। ८ ।।
************************
करी क्रमशः हे लेखन कवी अरुणदास
__________________________
कवी अरुणदास – अरुण वि. देशपांडे- पुणे.
___________________________