अवकाळीमुळे शेती व बागायतीच्या झालेल्या नुकसानीची भरपाई मिळावी – आमदार दीपक केसरकर
सावंतवाडी
कोकणात वारंवार होत असलेल्या अवकाळी पावसामुळे भात शेतीचे तसेच चक्रीवादळांमुळे फळबागायतींचे मोठ्या प्रमाणात नुकसान होत आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना तसेच बागायतदारांना याची नुकसान भरपाई देण्यात यावी अशी मागणी सावंतवाडी विधानसभा मतदारसंघाचे आमदार दीपक केसरकर यांनी विधान सभेत केली.
सध्या सुरू असलेल्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात त्यांनी याबाबत विधानसभा सभापतींचे लक्ष वेधले. शिवाय मंत्री महोदयांना सांगून याबाबत नुकसान भरपाई देण्याची तजवीज करणीची मागणी केली. अवकाळी पावसामुळे शेतकरी पूर्णपणे हतबल झाला आहे त्यामुळे शेतकऱ्यांना नुकसान भरपाई देऊन त्यांना न्याय द्यावा असे मागणे त्यांनी यावेळी केली.
कोकणात नुकताच अवकाळी पाऊस झाला आहे. यात फळ पिकांना मोठ्या प्रमाणात फटका बसला आहे. आंबा, काजू, कोकम, जांभूळ, आदी फळपिकांची मोठ्या प्रमाणात नुकसानी होत आहे. एप्रिल ते मे महिन्यात फळ पिके येतात. कोकणात वारंवार चक्रीवादळ येतात त्यामुळे फळबागा देखील नष्ट होत आहेत. या सगळ्याकडे आ. केसरकर यांनी लक्ष वेधले. झालेल्या नुकसानीचे पंचनामे करून नुकसान भरपाई देण्याबाबत तजवीज करण्याची विधानसभेत त्यांनी मागणी केली.