You are currently viewing श्री गजानन विजय काव्यांजली काव्यपुष्प – ८९ वे

श्री गजानन विजय काव्यांजली काव्यपुष्प – ८९ वे

*जागतिक साहित्य कला व्यक्तित्व विकास मंचचे सन्मा सदस्य कवी अरुण वि देशपांडे लिखित अप्रतिम काव्यरचना*

 

।। गण गण गणात बोते ।। जय गजानन श्री गजानन ।।

___________________________

श्री गजानन विजय काव्यांजली काव्यपुष्प – ८९ वे

अध्याय -१५ वा , कविता- ५ वी

___________________________

सरकारने शिक्षा सुनावली टिळकांसी । नेले त्यांना दूर

ब्रह्मदेशी। टाकिले मंडालेच्या तुरुंगात ।।१ ।।

 

शिक्षा भोगतांना एक झाले । टिळकांच्या हातून लेखन झाले। जे लेखन सिद्ध झाले । “गीतारहस्य ” ग्रंथरूप नाव त्याचे ।। २ ।।

 

लेखन त्यांचे हे महत्वाचे । भाष्य असे भगवदगीतेवरचे ।

सुगम सर्वांसाठीचे । असे हे लेखन लोकमान्यांचे ।।३।।

 

गीताशास्त्राचे महत्व अपार ।तेच टिळकांनी लिहिले साचार ।

आहे भगवदगीतेचे सार ।ग्रंथ गीतारहस्य हा ।। ४ ।।

 

ग्रंथ गीतारहस्य लेखन । टिळकांचे कार्य थोर महान ।

वाचक,अभ्यासू करिती गुणगान । टिळकांच्या कार्याचे ।।५ ।।

 

कोल्हटकरास स्वामी म्हणाले होते । होणार आहे मोठे कार्य टिळकांच्या हाते । स्वामींच्या शब्दात हेच अर्थ होते ।

गीतारहस्य ग्रंथ उदाहरण त्याचे होय ।। ६ ।।

******************************

क्रमशः करी हे लेखन कवी अरुणदास

__________________________

कवी- अरुणदास- अरुण वि.देशपांडे -पुणे.

___________________________

प्रतिक्रिया व्यक्त करा