*जागतिक साहित्य कला व्यक्तित्व विकास मंचच्या सन्मा सदस्या ज्येष्ठ लेखिका कवयित्री प्रा सौ सुमती पवार लिखित अप्रतिम काव्यरचना*
*माणसे..*
मेंढरे झालीत सारी मान खाली घालती
लाज वाटे माणसांना लाजाळू झाली माणसे…
झुंज गेली षंढ झाले वांझ झाली माणसे
शौर्य गेले शक्ती गेली बायका ही माणसे…
तलवार गेली ढाल गेली नपुंसक ही माणसे
रक्षणार्थ धावती ना पारखी ही माणसे..
माणसात माणसे ना कलेवर ही माणसे
मढीच सारी निरुपयोगी राख सारी माणसे…
खूप खूप छान सर गझल आपली भाळते
वाटते मज व्यर्थ मम रक्त का मी जाळते…
प्रा. सौ. सुमती पवार नाशिक.
(९७६३६०५६४२)