You are currently viewing वेंगुर्ले येथे क्षयरोग निदान व उपचार विषयावर डॉ. रविंद्र लिलके यांचे मार्गदर्शन

वेंगुर्ले येथे क्षयरोग निदान व उपचार विषयावर डॉ. रविंद्र लिलके यांचे मार्गदर्शन

वेंगुर्ले येथे क्षयरोग निदान व उपचार विषयावर डॉ. रविंद्र लिलके यांचे मार्गदर्शन

१०० दिवस राष्ट्रीय क्षयरोग जनजागृती अभियान अंतर्गत उपक्रम

वेंगुर्ले
भारत सरकार आणि केंद्रीय क्षयरोग विभाग क्षयरोग निर्मूलनासाठी विविध धोरणात्मक उपक्रम राबवत आहेत. याबाबत सिंधुदुर्ग जिल्हा क्षयरोग विभाग, वेंगुर्ले तालुका आरोग्य अधिकारी कार्यालय, आणि वेंगुर्ले तालुका मेडिकल असोसिएशन यांच्या संयुक्त विद्यमाने साई डिलक्स हॉल वेंगुर्ले येथे आयोजित ” क्षयरोग निदान व उपचार”, “१०० दिवस राष्ट्रीय क्षयरोग जनजागृती अभियान” आणि “कुष्ठरोग निवारण पंधरवडा कार्यक्रम” या विषयावर तालुका आरोग्य अधिकारी डॉ. रविंद्र लिलके यांनी सविस्तर माहिती दिली. त्यांनी क्षयरोगावरील शासकीय धोरणे आणि योजनांविषयी विवेचन केले.

यावेळी त्वचारोग तज्ज्ञ डॉ. किरण नाबर यांनी कुष्ठरोगाची लक्षणे, उपचार व रुग्णांनी घ्यायची काळजी यावर मार्गदर्शन केले. यावेळी व्यासपीठावर वेंगुर्ले मेडिकल असोसिएशनचे अध्यक्ष डॉ. राजेश्वर उबाळे, सचिव डॉ. संजीव लिंगवत, डॉ. प्रल्हाद मणचेकर, जिल्हा क्षयरोग पर्यवेक्षक रमेश परब उपस्थित होते. या कार्यक्रमाने क्षयरोग व कुष्ठरोग जनजागृतीसाठी महत्वाचा टप्पा गाठला आहे असुन यावेळी उपस्थित डॉक्टर यांच्या साठी आयोजित प्रश्न मंजुषा कार्यक्रमास आयोजिक यांनी समाधानकारक उत्तरे दिली. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी आरोग्य सहाय्यक विजय आंबेरकर, वरीष्ठ क्षयरोग पर्यवेक्षक एस्. टि. वराडकर, निम कुष्ठरोग वैद्यकीय कर्मचारी नम्रता धुरी, समन्वयक सुरेश मोरजकर, प्रकल्प अधिकारी प्रथमेश ओटवणेकर, कर्मचारी नितीन जाधव यांनी विशेष परिश्रम घेतले. यावेळी डॉ. डि.टि. शिवचरण, डॉ. प्रसाद साळगांवकर, डॉ. नयनेश गावडे, डॉ. के. जी. केळकर, डॉ. सतिश पाटील, डॉ. अश्विनी सामंत, डॉ. सई लिंगवत, डॉ. नेहा नवार, डॉ. सुदीश सावंत, डॉ. सोनाली सावंत, डॉ. अमरेश होडावडेकर, डॉ. अमेय खानोलकर, डॉ. सतिश पाटील, वंदन वेंगुर्लेकर, डॉ. परेश बोवलेकर, डॉ. आदेश आडेपवार, डॉ. गणेश गुट्टे, डॉ. धनश्री हिरेमठ , श्याम आगलावे, शुभम बुधेवार, डॉ. दत्तप्रसाद पवार, स्वप्नाली पवार, डॉ. नामदेव मोरे, डॉ. श्रिया सावंत आदी डॉक्टर्स उपस्थित होते. कार्यक्रमाचे स्वागत एस्. टी. वराडकर यांनी तर आभारप्रदर्शन डॉ. संजीव लिंगवत यांनी केले.

भारत सरकारने २०२५ पर्यंत टीबी मुक्त भारतचे लक्ष्य ठेवले असून, त्या दिशेने आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्रालयाने क्षयरोग निर्मूलनासाठी राष्ट्रीय धोरणात्मक योजना सुरू केली आहे. क्षयरोगाला कारणीभूत ठरणाऱ्या मायकोबॅक्टेरियम ट्युबरक्यूलोसिस जीवाणूमध्ये काही वेळा उत्परिवर्तन होऊन औषधांना दाद न देणारे प्रकार तयार होतात. अशा प्रकाराला औषधरोधक क्षयरोग म्हणतात. आदी बाबत सविस्तर माहिती यावेळी देण्यात आली.

प्रतिक्रिया व्यक्त करा