You are currently viewing आंबोली घाटात धोकादायक ठिकाणी संरक्षक जाळी बसवा

आंबोली घाटात धोकादायक ठिकाणी संरक्षक जाळी बसवा

आंबोली घाटात धोकादायक ठिकाणी संरक्षक जाळी बसवा

आंबोली सरपंच सौ.सावित्री पालेकर यांची बांधकामसह आपत्ती प्राधिकरणाकडे मागणी

सावंतवाडी

दर वर्षी पावसाळ्यात आंबोली घाटात घाट माथ्यावरुन दगडांची पडझद होऊन रस्त्यावर पडत असतात. घाटातील काही ठिकाणी संरक्षक जाळी बसाविण्यात आली आहे काही ठीकानी जाळी नसल्याने दरड कोसळण्याचे प्रमाण वाढत आहे.
मात्र बऱ्याच आवश्यक ठिकाणी संरक्षक जाळी बसविण्यात आली आहे आज सकाळी पहाटे मोठा दगड रस्त्यावर पडल्यामुळे मात्र कुठलेही जीवित हानी होऊ शकली नाही
संभाव्य धोक्याचा विचार करून आवश्यक ठिकाणी संरक्षक झाली सार्वजनिक बांधकाम विभागाने व जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्रधिकारणाने बसवण्यासाठी आवश्यक ती कार्यवाही करावी अशी मागणी आंबोली सरपंच सौ सावित्री पालेकर यांनी केली.

प्रतिक्रिया व्यक्त करा