You are currently viewing श्री गजानन विजय काव्यांजली काव्यपुष्प – १२८ वे

श्री गजानन विजय काव्यांजली काव्यपुष्प – १२८ वे

*जागतिक साहित्य कला व्यक्तित्व विकास मंचचे सन्मा सदस्य ज्येष्ठ कवी अरुण वि देशपांडे लिखित अप्रतिम काव्यरचना*

 

।। गण गण गणात बोते।। जय गजानन श्री गजानन ।।

___________________________

श्री गजानन विजय काव्यांजली काव्यपुष्प – १२८ वे

अध्याय – २१ वा , कविता- २ री

___________________________

 

रहातसे शेगावात । रामचंद्र पाटील हा भक्त । आले स्वामी गोसावी रुपात । पाटील सदनी ।। १ ।।

 

गोसाव्याने आवाज दिला। त्या पाटील भक्ताला । भूक लागली आहे मला । देई खाया मजला ।। २।।

 

पाटलांनी गोसाव्याकडे पाहिले । तो,त्यास स्वामी गजानन भासले । गोसाव्यास घरात आणले । पाटावरी बसविले ।।३।।

 

गोसावी बोले पाटलाला । तू माझे ऐक मुला । जे सांगेन मी तुजला । असेल ते भल्याचे तुझ्या ।।४।।

 

गोसाव्यासाठी ताट आणले । पोटभर ते जेवले । पाटलावरी

संतोषले । दक्षिणा घेउनी ।।५।।

 

पाटलास गोसावी बोलला । पाहिजे तू कारभार केला ।

मठासाठी दुसरा माणूस नाही भला । कुणी तुझ्याविना इथे ।।६। ।

 

गोसाव्याने उपदेश केला । ओळखावे माणसाला । दुखवू नये कधी कुणाला। मान मोठा तुझ्या पाटीलकीचा ।।७।।

 

संतांचा सन्मान करावा । दंभाचार कधी ना करावा ।

व्यवहार हमेशा चोख असावा। समाज-सेवा कार्यात ।।८।।

 

वरून कठोर असावे । मन निर्मळ,नितळ असावे ।अंतःकरण

दयाळू असावे । सर्वांविषयी ।।९ ।।

 

ताईत दिला पाटलाला । गोसावी निघून गेला । नाही पुन्हा दिसला । पाटील मनाशी म्हणे- स्वामीं आले भेटायला।।१०।।

**************************************

करी क्रमशः हे लेखन कवी अरुणदास

__________________________

कवी अरुणदास ” अरुण वि.देशपांडे- पुणे.

___________________________

प्रतिक्रिया व्यक्त करा