You are currently viewing पर्यावरणासाठी भारतातील जैवविविधता जपायला हवी*

पर्यावरणासाठी भारतातील जैवविविधता जपायला हवी*

*ज्येष्ठ लेखक कवी बाबू फिलिप्स डिसोजा (यमुनानगर निगडी) लिखित अप्रतिम लेख*

*पर्यावरणासाठी भारतातील जैवविविधता जपायला हवी*

जागतिक पर्यावरण दिन ५ जून ला संयुक्त राष्ट्रसंघाने जाहीर केलेला दिवस आहे. पर्यावरण जागृती व्हावी म्हणून हा दिवस पाळला जातो. चिंता आणि चिंतन या निमित्ताने व्हावे असे वाटते.
८० च्या दशकात मी खोपोली येथे रहात होतो. पावसाळ्यात बादलीने पाणी ओतावे असा पाऊस पडायचा. आठ आठ दिवस सूर्यदर्शन होत नसायचे.
खोपोली च्या तीनही बाजूचे डोंगर वृक्षराजी ने मनोहर दिसायचे. एक्सप्रेस मार्ग होताना हजारो झाडे कापली गेली. ना सार्वजनिक बांधकाम विभागाने, ना वनखात्याने त्या बदल्यात झाडे लावली नाहीत.
लोणावळे इथे बँकेत होतो तेव्हा बँकेत उन्हाळ्यात फक्त १५-२० दिवस फॅन लावायला लागायचा. आता हिवाळ्यात देखील फॅन लावायला लागतो.
९० च्या दशकात पुण्यात सिंहगड रोडला दुतर्फा वडाची झाडे होती. दिवसभर रोडवर छाया असायची.
दुपारी ४ नंतर थंडी वाटायची. रस्ता मोठा होताना, मेट्रो चे काम करताना झाडे तुटली.
सीबीडी बेलापूर ते वाशी नवी मुंबई येथे खाडीच्या लगत कांदळवन होते. नवी वस्ती होताना त्यांची अमर्यादित तोड झाली.
सर्वत्र थोड्याफार फरकाने असेच चित्र दिसते.
भारतात सध्या महापालिका उद्यानांत ,रस्त्याच्या कडेने जे वृक्षारोपण केले जाते त्यात बव्हंशी विदेशी वृक्ष लावले जातात.
मादागास्कर येथून भारतात आलेल्या गुलमोहराने, ऑॅस्ट्रेलियातून भारतात आणल्या गेलेल्या निलगिरी, सुबाभूळ, पेल्ट्रोफोरम, अकेशिया, स्पॅथोडिया, कॅशिया, ग्लिरिसिडीया, फायकस, सप्तपर्णी, रेन ट्री या झाडांमुळे हजारो एकरांवरील आपली जमीन नापीक झाली आहे.
दक्षिण अमेरिकेतून आलेल्या गव्हाबरोबर तिकडचे पार्थेनियम तण बीच्या स्वरूपात आपल्याकडे आले आणि स्थानिक पर्यावरणात या तणाने हाहाकार माजवला ज्याला गाजर गवत आणि काँग्रेस गवत म्हणतात. ह्याचे निर्मूलन अद्याप करता आलेले नाही. हे स्थानिक तण नसल्याने त्याला खाऊन फस्त करणारे जीवच इथल्या स्थानिक अन्नसाखळीत नांदत नसल्याने, त्याची बेसुमार वाढ झाली.अशा प्रकारे विदेशी झाडांची केलेली लागवड आपल्या जीवनचक्रावर परिणाम करत असल्याचे दिसते.
या झाडांच्या फुलात परागकण नाहीत त्यामुळे त्यावर फुलपाखरासारखे कीटक येत नाहीत. या झाडांच्या मुळांनी जमिनीतील पाणी शोषून घेतल्याने पाण्याचे प्रमाण कमी झाले आहे. या झाडांच्या पानांनी आणि सावलीने आपल्या जमिनी निकृष्ट केलेल्या आहेत.
या झाडांच्या फांद्यांचा, बुंध्यांचा उपयोग आपल्याला काहीच नाही. त्यामुळे रातकिडे, वटवाघूळ, चिमणी, घार, गिधाडे, गरुड, घुबड अशा सर्रास दिसणाऱ्या पक्षांचा वावर दुर्मिळ झाला आहे.
देशी झाडांवर होणाऱ्या परागकण प्रक्रियेला आणि पक्ष्यांद्वारे होणाऱ्या बीजप्रसाराच्या कामाला खीळ बसत असून कीटक, किडे, पक्षी जोडणारी निसर्गसाखळी तसेचअन्नसाखळी कमकुवत होतेय. परदेशी झाडाची पाने, फुले, शेंगा आपल्याकडील गाय, बैल, शेळीसुद्धा खात नाहीत.
माकडे देखील परदेशी झाडावर बसत नाहीत. म्हणजे मुक्या प्राण्यांना जे कळते की, परदेशी झाडे घातक आहे ते. आपल्याला अजून कळलेले नाही हेच मोठे दुर्देव. याचमुळे निसर्गाच्या अन्नसाखळीत एकमेकांवर अवलंबून असलेले अनेक जीव नामशेष होण्याच्या मार्गाकडे ढकलले जात आहेत. या प्राणी, पक्षी आणि वनस्पतींवर उपजीविका करणारे माकड, वाघ, हत्ती, बिबटे, गवे हे प्राणी अन्नाच्या शोधात मानवी वस्तीकडे येत आहेत. कोकणात, पश्चिम महाराष्ट्रातल्या निवासी भागात हे प्राणी आल्याच्या बातम्या आपण वाचतो.
ग्लिरिसिडीया सारख्या झाडाच्या फुलावरून उंदीर, घुशी गेल्या, तरी ते अपंग होतात, मरतात. या झाडाखालुन चालताना धाप लागते. या झाडापासून विषारी वायु उत्सर्जित केला जातो, त्यामुळे पावसाचे प्रमाण कमी होते. आज जवळपास ९०% सरकारी जंगले व नर्सरी ग्लिरिसिडीयाने भरलेली आहेत.
ग्लिरिसिडीया हे झाड भारतीय जंगलात लावण्याची अट घातली, तेव्हापासून आपल्याकडे ग्लिरिसिडीया हे झाड आले.
फायकस या झाडाच्या पानाचा धुर घेतल्यास शरीर सुजते. परदेशी झाडांचे कोणतेही आयुर्वेदीक उपयोग नाहीत. त्यापासुन ऑक्सीजन देखील मिळत नाही. जिथे मोठ्या प्रमाणावर परदेशी झाडे आहेत, तेथे फिरायला जाणाऱ्या नागरिकांमधे ह्रदय रोगाचे प्रमाण वाढलेले असल्याचे संशोधनावरुन सिध्द झालेले आहे.
मोठ्या प्रमाणावर परदेशी झाडे लावली गेली आहेत. नीलमोहोर, काशीद, सप्तपर्णी अशी स्थानिक दिशाभुल करणारी नावे दिलेली आहेत की, कोणते झाड परदेशी समजायचे असा गोंधळ निर्माण होतो. ज्या झाडांवर आपल्याकडील पक्षी बसत नाहीत आणि घरटी करत नाहीत ते झाड परदेशी समजावे.
” अश्वत्थमेकं पिचुमंदमेकं न्यग्रोधमेकं दशचिंचिणीकम।कपित्थबिल्वा मलकत्रयं च पंचाम्रवापी नरकं न पश्येत्।”
“अर्थात पिंपळ, कडुलिंब आणि वड यापैकी एक वृक्ष आणि चिंचेची दहा झाडे किंवा कवठ, बेल आणि आवळा यापैकी कोणत्याही जातीचे तीन वृक्ष आणि आंब्याची पाच झाडे जो लावेल, तो नरकात जाणार नाही.” पुराणात असे सांगूनच ठेवलेलं आहे.
वडाला, उंबराला देवाचा दर्जा दिला गेलाय. देशी वृक्ष आपल्या जंगलात किंवा स्थानिक हिरव्या पट्टयात पर्यावरणाचा समतोल साधत असतात. त्यांच्या अस्तित्वाशी जुळवून घेतलेली, त्यावर जोपासली जाणारी सजीव व्यवस्था असते. या सजीव व्यवस्थेत मनुष्य, प्राणी, पक्षी, कीडे, कीटक सामावलेले असतात. पक्ष्यांना, किडयांना आणि कीटकांनाही अन्न, निवारा मिळतो.
देशी झाडांच्या गळलेल्या पानांतून जमिनीवर जमणाऱ्या पाचोळयातून तयार होणाऱ्या खतातून जमिनीचा कस वाढत असतो. विघटन झालेल्या पालापाचोळयाच्या खतातून निर्माण होणारी पोषकद्रव्ये पुन्हा झाडाकडे पाठवण्याचे काम झाडांची दूरवर पसरणारी मुळे करत असतानाच खोलवर जाऊन ती जमिनीवरच्या मातीला धरून ठेवतात. विविध कीटकांना, किडयांना आणि सरपटणाऱ्या जीवांना अशी उत्तम जमीन उपयुक्त ठरते आणि एक परिपूर्ण पर्यावरण निर्माण करते. ऑक्सिजनचे आणि पावसाचे प्रमाण वाढते. ढगांना पाऊस पाडण्यासाठी आवश्यक असलेला गारवा निर्माण करण्याची क्षमता आपल्या देशी झाडामध्ये आहे. त्यांचे प्रमाण कमी झाल्याने अवकाळी पाउस, चुकलेले उन्हाळा, पावसाला, थंडी यांचे चक्र आपल्याला वेगाने विनाशाकडे घेवून जात आहे.
देशी झाडांच्या फांद्या, ढोल्या या विविध पक्ष्यांचा निवारा बनतात. साधारणपणे ३५० पेक्षा जास्त जातीची झाडे वटवाघळं निसर्गात रोपण करीत असतात यात आंबा, जांभूळ, चिकू, बोर, उंबर, वड, पिप्रण, नांदरूक, मोहा, सीताफळ, रामफळ अशी अनेक फळझाडे असून सर्वात अगोदर फळ पिकते हे वटवाघळाला समजते.
पांगारा, सावर, सिताफळ, जांभुळ, कोकम, कडुनिंब, करंज, बहावा, उंबर, वड, पिंपळ, चिंच, आपटा, कांचन, बहावा, कदंब, फणस, आवळा, आंबा, कवठ, बेल, कडुनिंब, मोह, पळस ही झाडे लावायला हवीत.
बेसुमार वृक्षतोडीमुळे पावसाचे प्रमाण हळुहळु कमी होत चालले आहे.पाण्याची टंचाई निर्माण होते आहे.१०० टक्के भरलेली धरणे रिकामी होताहेत. सर्वत्रच
भूगर्भजलपातळी खाली जाते आहे. त्यामुळे दुष्काळाची तीव्रता वाढते आहे.
यासाठी आपण योग्य झाडांची लागवड आणि संवर्धन करायला हवे. अशीच अनास्था राहिली तर, आपणास हिरवळ दिसेल, मात्र जैवविविधता दिसणार नाही.

(साधार)
बाबू फिलीप डिसोजा (कुमठेकर)
हिमगौरी बिल्डिंग २१,सेक्टर२१,
स्कीम १०,यमुनानगर,
निगडी पुणे-४११०४४
मो. 9890567468

 

*संवाद मिडिया*

*🧑🏻‍🎓प्रवेश..सुरू ! प्रवेश..सुरू ..!! प्रवेश..सुरू ..!!!🧑🏻‍🎓*

📣 *B. C. A. DEGREE*

*BCA Degree ला ॲडमिशन म्हणजे संगणक क्षेत्रात करिअर करण्याची सुवर्णसंधी.*🧑‍💻🧑‍💻

*👉 प्रवेश पात्रता…*
*▪️प्रथम वर्ष बीसीएकरिता: कोणत्याही शाखेची बारावी परीक्षा (गणित किंवा गणिताशिवाय) किमान ४५ टक्के व मागासवर्गीयांसाठी ४० टक्के गुणांसह उत्तीर्ण किंवा अभियांत्रिकी पदविका उत्तीर्ण*
*▪️थेट द्वितीय वर्ष बीसीएकरिता: डिप्लोमा पदवीका प्रथम श्रेणीत उत्तीर्ण (सिव्हिल इंजिनियर व्यतिरिक्त)*
*▪️मर्यादित प्रवेश उपलब्ध*

*संपर्क:*
*महर्षी कर्वे स्त्री शिक्षण संस्था, कॉलेज ऑफ कॉम्प्युटर ॲप्लिकेशन फॉर वुमन्स*
*(एसएनडीटी महिला विद्यालय, मुंबई संलग्न)*
*साखरतर रोड, शिरगाव, रत्नागिरी*

*📱 ७९७२९९७५६७, ९४२०२७४११९*

*Advt Link*
https://sanwadmedia.com/98807/
———————————————-

प्रतिक्रिया व्यक्त करा

1 × 5 =