You are currently viewing बंदिवान कैद्यांमध्ये जिवंत असलेली माणुसकी…

बंदिवान कैद्यांमध्ये जिवंत असलेली माणुसकी…

जिल्हा मुख्यालयातील पत्रकारांना आला अनुभव

 

सिंधुदुर्गनगरी :

 

गुन्हेगारीत अडकलेले हात जेव्हा शिक्षेनंतर बंदिवान कैदी म्हणून कारागृहात दाखल होतात, व हेच हात कारागृहातील भकास माळरानावर नंदनवन फुलवतात तेव्हा मात्र कैद्यांमध्ये जिवंत असलेली माणुसकी मेहनत करण्याची क्षमता व अविचाराला लगाम घालण्याची पात्रता त्यांच्या दिसून येते. या कैद्यांमधील माणुसकी जपत त्यांच्या हाताला काम देऊन भाजीपाला वनशेतीतून फुलवलेले नंदनवन पाहून खूपच समाधान वाटते! जिल्ह्यातील भगीरथ प्रतिष्ठानचे प्रसाद देवधर व येथील वरिष्ठ तुरुंग अधिकारी रवींद्र टोंगणे यांनी कायद्यांच्या मनात निर्माण केलेला विश्वास अभिमानास्पद वाटतो! बुधवारी हा कारागृह पाहण्याचा मुख्यालय पत्रकारांना योगायोग आला अन बंदिवान कैद्यांचा जीवनप्रवास अनुभवता आला!

बहुतांशी गुन्हे हे अपघाताने होत असतात रागाच्या भरात किंवा स्वतःवरील संयम सुटल्यामुळे गुन्हे होतात व आरोपींना शिक्षा होऊन ते कारागृहातील बंदीवान कैदी होतात. पण आज त्यांना भेटण्याचा योग आला. भगीरथ प्रतिष्ठानचे अध्यक्ष प्रसाद देवधर यांच्या पुढाकारामुळे मुख्यालय पत्रकार संघाचे सर्व सभासद पत्रकार सिंधुनगरीत कार्यरत असलेल्या पत्रकारानी बुधवारी जिल्हा कारागृहाला भेट दिली व बंदिवान कैद्यांशी संवाद साधला. कारागृहातील बंदी अर्थात कैदी हे पण माणूस आहेत त्यांच्यातही माणुसकी जिवंत आहे ही जाणीव आज झाली. या कारागृहाचे वरिष्ठ तुरुंग अधिकारी रवींद्र अर्जुन टोंगणे यांचा मोठेपणा त्यांच्यातील माणुसकी त्यांच्या कृती मधून दिसून आली. कारागृह नाही तर हे कैद्यांचे सुधार गृह आहे, शासनाची अशीच अपेक्षा आहे अशी प्रतिक्रिया आहे त्यांनी यावेळी व्यक्त केली.

न्यायालयीन निर्णयानंतर काही कैदी न्यायालयीन कोठडीत येतात. तर काही कैदी शिक्षा भोगणारे असतात. सिंधू नगरी येथील हे जिल्हा कारागृह वर्ग एक राज्याचे असून 120 कधी राहू शकतील एवढे बॅरॅक आहेत. बांधकाम वाढवले तर 200 राहू शकतील एवढा या कारागृहाचा दर्जा आहे. सध्या या कारागृहात 96 कैदी असून बारा कैदी जन्मठेपेची शिक्षा भोगणारे आहेत. तर 36 कैदी न्यायालयीन कोठडी मधील आहेत. या सर्व केंद्यानी शेतीमध्ये केलेले काम खरोखरच कौतुकास्पद म्हणावे लागेल. गेल्या तीन महिन्यात त्यांनी दोन लाखाची भाजीपाला विकून शासनाला मिळवून दिलेली कमाई ही गौरवास्पद आहे!

रागाच्या भरात नकळतपणे गुन्हा होतो व त्याची शिक्षा भोगताना पश्चाताप होतो व ही परिस्थिती सहन करणारी नसते! खरे तर रागाच्या भरात आपण चुकलो अशी कबुली नांदेड जिल्ह्यात प्राथमिक शिक्षक म्हणून असलेल्या एका कैद्याने मुख्यालय पत्रकारांशी बोलताना व्यक्त केली. घरगुती वादातून आपण व आपला मुलगा माझ्या सासूला ढकल्याने तिचा मृत्यू झाला व तिच्या मृत्यू जबाबदार ठरल्यामुळे खुनाचा गुन्हा दाखल होऊन आम्हा बापलेकांना जन्मठेपेची शिक्षा झाली. आपली दोन वर्षे शिक्षा बाकी असून या कारागृहात वरिष्ठ तुरुंगाधिकारी रवींद्र टोंगणे यांनी दाखवलेली माणुसकी व दिलेली शिकवण खूप मोलाचे आहे. आपली नोकरी गेली आता नोकरी मला मिळणार नाही तरीपण मी या कारागृहातील सिंधुदुर्ग च्या मातीत मी शेती शिकलो. दोन वर्षानंतर शिक्षा बघून बाहेर पडल्यानंतर नांदेड मधील माझ्या गावाकडे एक उत्तम शेतकरी म्हणून नावलौकिक मिळवेन असा विश्वास आहे या कैद्याने मनमोकळेपणे व्यक्त केला!

या कारागृहात असलेले कैदी सात एकरच्या क्षेत्रावर भाजीपाला शेती करून केलेली प्रगती या कारागृहाची प्रतिष्ठा वाढविणारी ठरली आहे. या कारागृहात असलेले 96 कैदी एवढे नंदनवन फुलतात तर देशात पाच लाखाच्या घरात असलेले कारागृहातील काही त्यांच्या हात अशा विकासासाठी जोडले गेले तर काय कायद्यामधील माणुसकी जागी होईल अशाम करून जीवन जगण्याची एक नवी संधी त्यांना मिळेल असे विचारही सिंधू नगरीतील जिल्हा कारागृह पाहून वाटून गेले. सिंधुदुर्गच्या जिल्हाधिकारी मंजू लक्ष्मी यांनीही ही शेती करण्यासाठी कैद्याना तात्काळ ट्रॅक्टर उपलब्ध करून दिला याबद्दलही तुरुंग अधिकारी रवींद्र टोंगणे यांनी त्यांच्या सहकार्याबद्दल आवर्जून उल्लेख केला.

प्रतिक्रिया व्यक्त करा