You are currently viewing सर्व कार्यक्रम राजकीय चष्मा लावून पाहणे आमदारांनी सोडावे

सर्व कार्यक्रम राजकीय चष्मा लावून पाहणे आमदारांनी सोडावे

– विजय केनवडेकर,  जिल्हाध्यक्ष उद्योग व्यापार आघाडी भाजपा सिंधुदुर्ग

आमदार मा. वैभव नाईक यांनी मा. नारायण राणे यांच्या मंत्रालयांऱ्या कार्यक्रमावर भाजपा कार्यकर्त्यांनी पाठ फिरवली अशी टीका केली आहे.
या औद्योगिक सक्षमीकरणाच्या कार्यक्रमाबाबत पहिल्यांदा संपूर्ण माहिती आमदारांनी घेणे आवश्यक होते.काही गोष्टी या भंपक पणाने करावयाच्या नसतात .ज्यांना आवश्यक आहे त्यांच्यापर्यंत योजना पुरवणे हा संकल्प ठेवून हा कार्यक्रम करण्यात आला होता.मा. वैभव नाईक यांनी सर्वच गोष्टीला राजकीय चष्मा लावून पहाणे आता बदलणे आवश्यक आहे. कणकवली येथील कार्यक्रम उद्योग धंद्याची माहिती नाविन्यपूर्ण उद्योग नवीन उद्योगांना येणाऱ्या अडचणी त्यावर काढावयाचे मार्ग असा उद्योजकांशी चर्चा करण्यासाठी हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता.हा पक्षीय कार्यक्रम नसून नवीन उद्योजकांना संधी देणारा हा कार्यक्रम होता.या कार्यक्रमात सिंधुदुर्ग जिल्ह्यातील नवीन उद्योग व उद्योग वाढीसाठी ३०३ उद्योजकांना उद्योग मंत्रालया अंतर्गत चार योजनेमार्फत पंधरा कोटी सतरा लाख रुपये कर्ज उपलब्ध करून वितरित करण्यात आले .त्याच बरोबर सिंधुदुर्ग जिल्ह्यातील ५१७ उद्योजकांना उद्योग आधारला मोफत लिंक करून देण्यात आले. सिंधुदुर्ग जिल्ह्यातील विविध तेरा गटाना स्फुर्ती योजनेची माहिती देऊन त्यासंबंधी आवश्यक कंपनी नोंदणीकृत करण्याची प्रक्रिया सुरू करण्यात आली.
उद्योग मंत्रालयाची एक्सपर्ट टीम मालवण देवगड येथे प्रत्यक्षपणे भेट देऊन मच्छीमारांसाठी आवश्यक कॉमन फॅसिलिटी सेंटर तसेच पर्यटन व्यवसायसाठी कॉमन फॅसिलिटी सेंटर यासाठी सर्वे करून काही उद्योजकांच्या गाठीभेटी घेऊन या संबंधी माहिती देण्यात आली.या दोन सेंटर साठी भाजपा मालवण तर्फे आवश्यक कागदपत्रांची पूर्तता करण्याचे काम सुरू करण्यात आले आहे.
याच कार्यक्रमांतर्गत कुडाळ येथे आंबा बागायतदारांना आवश्यक असणारे प्रक्रिया व पॅकेजिंग युनिट क्लस्टर मार्फत उभे राहत आहे . कॉयर बोर्ड मार्फेत काथ्या उद्योगाचे कोकोपीट खरेदी प्रक्रिया उद्योग मंत्रालयातून सुरू करण्यात आली आहे.याचा फायदा बरेच काथा उद्योजक सिंधुदुर्गात घेत आहेत .सिंधुदुर्ग जिल्ह्यातील सर्व फळांचा बहर ४५ दिवसाच्या पर्यंत असतो कोकम सारखी फळे पावसाच्या तोंडावर मोठ्या प्रमाणात बहरतात व त्याचे मोठे नुकसान होते म्हणून सर्व फळे कशी स्टोअर करून त्याच्यावर प्रक्रिया करता येईल यासाठी आवश्यक संशोधन उद्योग मंत्रालयाच्या अंतर्गत स्टार्टअप इंडिया मार्फत केले जात आहे.बरेच नाविन्यपूर्ण छोटे मध्यम प्रकल्प सिंधुदुर्गात स्थानिक उद्योजक उभारण्याचे धाडस करत आहे. त्यांना मार्गदर्शन करण्याचे काम मा.नारायण राणे यांच्या उद्योग मंत्रालयातून करण्यात येत आहे.
मा. नारायण राणे यांच्या पुढाकाराने उद्योग मंत्रालयामार्फत फेब्रुवारीमध्ये सिंधुदुर्गनगरी व कणकवली येथे उद्योग मंत्रालया मार्फत माहिती व प्रसारण यासंबंधी दोन कार्यक्रम झाले होते. या कार्यक्रमाला उस्फूर्त प्रतिसाद मिळाल्यामुळे व नवीन उद्योजक व तरुणांचा प्रतिसाद पाहता राणे साहेबांनी असे कार्यक्रम तालुक्या तालुक्यात घ्यावे असे आदेश मंत्रालयाला दिले होते.याच अनुसरून कणकवली येथे कार्यक्रम घेण्यात आला होता.याच वेळी राणे साहेबांनी भारतातील तिसरे कॉमन फॅसिलिटी सेंटर सिंधुदुर्ग जिल्ह्यात उभे करण्याचा मानस बोलून दाखविला होता. यासंबंधी आवश्यक प्रशासनाने जागा उपलब्ध करून दिल्यास तीनशे कोटीचे भव्य सेंटर उभे राहून तरुण उद्योजकांना याचा मोठा फायदा होणार आहे.आता आपण सत्तेत आहात त्याच मुळे सिंधुदुर्ग जिल्ह्यातील युवकांच्या कौशल्या साठी राजकारण बाजूला ठेवू प्रशासनाकडून जागा उपलब्ध करून देण्यासाठी प्रयत्न तरी करा.आमदार साहेब मा. नारायण राणे जिल्ह्यातून गेले कि टिका करायची व जिल्हा नियोजनच्या सभेच्या वेळी समोर आल्यावर राणे साहेबांच्या कानात गोष्टी सांगायच्या हे सर्व जनतेने पाहिले आहे.कोण मळ्यात तळ्यात हे जनता पूर्णपणे जाणून आहे. सिंधुदुर्ग जिल्ह्यातील सर्व सामान्य भाजप कार्यकर्ता कधीच राणेची साथ सोडणार नाहीत.उद्योग मंत्रालयाची जबाबदारी राणे साहेबांवर आल्यापासून पक्षाचे कार्यकर्ते तरुणांना सक्षमीकरण यासाठी वेगवेगळ्या उद्योजकाच्या योजना राबवण्यासाठी प्रयत्न करीत आहेत.राणे साहेबांकडे उद्योग मंत्रालय आल्यापासून सर्व पक्षाचे कार्यकर्ते उद्योग वाढीसाठी राणे साहेबांना भेटत असतात याची पूर्ण जंत्री भाजप कडे उपलब्ध आहे.पश्चिम महाराष्ट्र विदर्भ व मराठवाड्यातील शिवसैनिक व नेते पक्ष बाजूला ठेवून आपल्या भागात उद्योग उभारणीसाठी व त्या योजनेचा फायदा मिळविण्यासाठी मोठ्या मनाने राणे साहेबांकडे जाऊन उद्योजकांना चालना देत आहेत. मराठी उद्योजक उभा राहत आहे म्हणून राणेसाहेब पक्ष बाजूला ठेवून देशाच्या हितासाठी काम पाहत आहेत.याच मुळे तीन महिन्याच्या केंद्रीय कॅबिनेट मंत्रालयात उद्योग खात्याचा एक नंबर लागून ९८.८ % कामे पूर्ण केल्याने मा.पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी राणे साहेबांचे कौतुक केले आहे.
मालवणात मा. निलेश राणे युवा नेते यांच्या नेतृत्वाखाली मच्छिमार कॉमन फॅसिलिटी सेंटर व पर्यटन कॉमन फॅसिलिटी सेंटर उभे करण्याचे काम सुरू करण्यात आले आहे.यासाठी मच्छीमार व पर्यटन व्यावसायिक यांना एकत्रित करून या योजनेची पूर्ण माहिती जुलैमध्ये मालवणात देण्यात येणार आहे. या सेंटर चा पर्यटन वाढीसाठी व युवकांना अत्याधुनिक योजनेचा फायदा घेण्यासाठी उपयोग होणार आहे.
सिंधुदुर्गात भव्य कृषी महोत्सव मा. नारायण राणे यांनी सुरू केला.शेतकऱ्यांना उपयुक्त कार्यक्रम म्हणून सिंधुदुर्ग जिल्हा परिषदेने कृषी महोत्सव घेऊन आधुनिक यंत्रसामुग्री आधुनिक शेती फळबागायती मधले प्रयोग याची माहिती सिंधुदुर्ग जिल्ह्यातील शेतकरी बागायतदार यांना करून दिली. कृषी प्रदर्शना मार्फत आधुनिकीकरणा कडे नेण्याची मानसिकताया कृषी महोत्सवामुळे झाली.असे असताना आमदार साहेब फक्त आम्हीच कृषी महोत्सव यशस्वी केला म्हणून आपलीच पाठ थोपटून घेत आहेत.
विरोधाला विरोध हे आता सोडून युवकांना सक्षमीकरण करण्यासाठी उद्योग मंत्रालयातून होत असणाऱ्या प्रयत्नाला राजकारण बाजूला ठेवू सहकार्य करा अशी संधी परत उपलब्ध होणे शक्य नाही हे पण लक्षात घ्या .
विजय केनवडेकर
जिल्हाध्यक्ष
उद्योग व्यापार आघाडी भाजपा सिंधुदुर्ग

प्रतिक्रिया व्यक्त करा