You are currently viewing अखेर प्रयत्नांना यश…

अखेर प्रयत्नांना यश…

मल्हार पुलाच्या पुनर्बांधणी साठी 6 कोटी रुपये मंजूर

कोकणात झालेल्या मुसळधार पावसामुळे कोसळेल्या सिंधुदुर्ग जिल्ह्यातील कणकवली – कनेडी राज्य मार्गावरील नाटळ मल्हारी नदीवरील मल्हार पुलाच्या पुनर्बांधणी तातडीने 6 कोटी रुपये देण्यास आज सार्वजनिक बांधकाम मंत्री अशोक चव्हाण यांनी मंजुरी दिली आहे. हा पुल कोसळ्यामुळे कनेडी परिसरातील गावांचा संपर्क तुटला होता. त्यामुळे तातडीने या पुलाची पुनर्बांधणी सुरू करण्याचे निर्देश श्री. चव्हाण यांनी दिले आहेत.
दरम्यान बुधवारी मंत्रालयात माननीय श्री.अशोकराव चव्हाण साहेब यांची भेट श्री. महिंद्र सावंत काँग्रेस जिल्हा सरचिटणीस व श्री.डी. पी. सावंत  माजी मंत्री व नाटळ गावचे सुपुत्र यांनी निवेदन सादर केले होते. त्याला ताबडतोब मंत्रीमहोदय यांनी ६ कोटो जाहीर केले. त्याबद्दल महिंद्र सावंत व जिल्हा काँग्रेस ने आभार मानले आहेत.

प्रतिक्रिया व्यक्त करा