You are currently viewing ट्रक-दुचाकी अपघातात वरवडेतील युवक ठार…

ट्रक-दुचाकी अपघातात वरवडेतील युवक ठार…

महामार्गावरील पन्हळे-राजापूर येथिल घटना…

कणकवली

मुंबई गोवा महामार्गावरील राजापूर पन्हळे येथे दुचाकी आणि ट्रक अपघातात कणकवली तालुक्यातील वरवडे – फणसवाडी येथील मोटरसायकलचालक जयेश दिलीप जोशी ( वय २१ ) हा जागीच ठार झाला. तर मागे बसलेला ओंकार गावकर हा गंभीर जखमी झाला आहे. हा अपघात आज सकाळी ६ वाजता वाजण्याच्या सुमारास घडला.
याबाबत अधिक वृत्त असे की, वरवडे फणसवाडी येथील जयेश दिलीप जोशी हा आपल्या ताब्यातील यामाहा आर १५ ही मोटरसायकल घेऊन मुंबईच्या दिशेने जात होता. मोटरसायकलवर ओंकार गावकर हा मागे बसला होता. राजापूर पन्हळे येथे समोरुन जाणाऱ्या ट्रकला मोटरसायकलची धडक बसली. धुक्यामुळे समोरून जाणाऱ्या ट्रकचा अंदाज न आल्यामुळे जयेश याने ब्रेक लावला असता मोटरसायकल स्लिप झाली आणि ट्रकला मागून आदळली. या अपघातात जयेश याचा जागीच मृत्यू झाला. तर मागे बसलेला ओंकार गंभिर जखमी झाला आहे.

प्रतिक्रिया व्यक्त करा