You are currently viewing श्री गजानन विजय काव्यांजली काव्यपुष्प – १३१ वे

श्री गजानन विजय काव्यांजली काव्यपुष्प – १३१ वे

*जागतिक साहित्य कला व्यक्तित्व विकास मंचचे सन्मा सदस्य ज्येष्ठ कवी अरुण वि देशपांडे लिखित अप्रतिम काव्यरचना*

 

।।गण गण गणात बोते ।। जय गजानन श्री गजानन ।।

*********

श्री गजानन विजय काव्यांजली काव्यपुष्प – १३१ वे

अध्याय – २१ वा , कविता – ५ वी

___________________________

हरी पाटला बरोबर । महाराज कुस्ती खेळले खरोखर ।

त्याच्या आव्हानास दिले उत्तर । निरुत्तर केले पाटलास ।।१।।

 

पाटील बंधूंनी त्रास दिला । स्वामींनी हाताने ऊस पिळला । तो रस पिण्यास दिला । गर्व दूर केला पाटील बंधूंचा ।।२।।

 

भिक्या नामे पुत्र दिला । खंडू पाटलाला । आम्र- भोजन करा-आदेश दिला । त्यास , स्वामींनी ।। ३।।

कथा असती या सप्तम अध्यायात.

 

देशमुख-पाटील दोघात भांडणे होती । कटकटी-मारामारी होती । एकमेकांना त्रास देती । सदा , हे दोघे ।। ४।।

 

एकावेळी देशमुखांना संधी मिळाली । त्यांनी पाटलाविरुद्ध

तक्रार केली । परिस्थिती बिकट ओढवली । पाटलावरी ।।५।।

 

समर्थांची कृपा झाली । निर्दोष सुटका पाटलाची झाली ।

भक्ती त्याची जडली । स्वामींच्या चरणी ।।६।।

 

कृष्णाजीच्या मळ्यात स्वामी आले । मंदिरा शेजारी छपरात

राहिले । ब्रह्मगिरी गोसावी आले । शिष्यासाहित ।।७।।

 

जळत्या पलंगाची घटना घडली । गोसाव्यास जाणीव झाली ।क्षमा त्याने मागितली । स्वामी गजाननाची ।।८।।

कथा या अष्टम अध्यातल्या..।

 

कथेकरी बुवाचा द्वाड घोडा शांत केला । नवस गांजाचा केला। परी जो विसरला । त्यास बोध केला , मेळ ठेवा बोलण्यात रे ।।९।।

 

दासनवमी उत्सवा भले । स्वामी बाळापुरा आले । रामदास-रूप दर्शन घडविले । बाळकृष्ण रामदासीला ।।१०।।

इति नवम अध्याय..

***********

करी क्रमशः हे लेखन कवी अरुणदास

__________________________

कवी अरुणदास ” अरुण वि. देशपांडे – पुणे.

___________________________

प्रतिक्रिया व्यक्त करा