*जागतिक साहित्य कला व्यक्तित्व विकास मंचचे सन्मा सदस्य ज्येष्ठ कवी विनायक जोशी लिखित अप्रतिम काव्यरचना*
*कशाला देता नावं वेगळी?*
कशाला देता नावं वेगळी?
वादळ म्हणजे फक्त उन्माद
होते नुकसानीची परिसीमा
किती जीव होती *बरबाद*
//1//
नारळी पोफळी केळी बागा
शाप तयांचा मिळे वादळास
मेहनत करून *वर्षोनवर्षे*
नेतात *वादळे* रसातळास
//2//
बाळे सारी *शेतक-यांची*
प्राण जाऊन *मान टाकती*
धाय मोकलून रडतो “राजा”
“आतबट्ट्याची” ठरते शेती
//3//
पपई केळी द्राक्ष *बागाही*
क्षणात बुंधे आकाश पहाती
घास तोंडचा “बळीराजाचा”
हिसकावण्याची होते छाती
//4//
वादळ नसून काळ सावली
नशीबी असे आधी लिहीली
कष्टांचे करून दफन भूमीत
वर्षोन वर्षे *विकट हांसली*
//5//
विनायक जोशी 🖋️ठाणे
मीलनध्वनी/9324324157

