*ज्येष्ठ कवी मोहन मराठे लिखित अप्रतिम काव्यरचना*
*”व्यथीत रातराणी”*
बहललेली रातराणी
जी कधी गजराच वाटे
गंध सुगंधी आसमंती
मन तसे मोहरुन जाते. /१/
वेणीलाही कळलाच नाही
गंध फुल निर्माल्य वाटे
कोण कसा मोहरुन जातो
रातराणी ला गूढ वाटे. /२/
मोग-याच्याही गज-यात आहे
दोन भासांच्या दोन व्यथा
एक जाई ईश्वर चरणी तर,
गल्लीतल्या खोलीत दुसरा
पायदळी तुडवून आहे. /३/
कोमल सुमनांच्या अंगावरुनी
अनेक भ्रमर फिरत आहेत
कळी बिचारी,मना विचारी
माझाही शेवट असाच आहे?
रचना:— मोहन मराठे
