You are currently viewing श्री गजानन विजय काव्यांजली काव्यपुष्प- १२० वे

श्री गजानन विजय काव्यांजली काव्यपुष्प- १२० वे

*जागतिक साहित्य कला व्यक्तित्व विकास मंचचे सन्मा सदस्य ज्येष्ठ लेखक कवी अरुण वि देशपांडे लिखित अप्रतिम काव्यरचना*

 

।।गण गण गणात बोते । जय गजानन श्री गजानन ।।

––————————————–

श्री गजानन विजय काव्यांजली काव्यपुष्प- १२० वे

अध्याय -१९ वा, कविता -१२ वी

___________________________

 

भाद्रपद शुद्ध पंचमीला । गुरुवारी प्रहर दिवसाला । शके

अठराशे बत्तीसला । साधारण नाम संवत्सराला ।।१।।

 

जय गजानन शब्द भला । या थोर महात्म्याने उच्चारला ।

आणि लीन झाला । जन हो, शेगावला ।।२ ।।

 

वृत्त सर्वत्र पसरले । स्वामी समाधिस्थ झाले । लोक धावू लागले । स्वामींच्या दर्शना ।३।।

 

का आम्हांसी सोडिले । स्वामी, भक्त शोकाकुल झाले ।

आमचे छत्र आज गेले । करावे काय आम्ही आता ? ।।४।।

 

शिष्यांनी, भक्तांनी ठरविले । आपण घाई करणे ना चांगले ।

भक्तांना पाहिजे घडले । दर्शन स्वामींचे ।। ५ ।।

 

समाधी विधीसाठी थांबले । भक्तांना येऊ दिले । मग,पार पडले विधी समाधीचे ।। ६।।

 

ऋषी पंचमीला । अपार मेळा जमला । आले लोक शेगावला। स्वामींच्या दर्शना ।। ७।।

 

स्वामींची मिरवणूक निघाली । शेगावात फिरवली । गर्दी रथाच्या भवताली । सतत होती ।।८।।

 

पहाट उजाडली । मिरवणूक मठात आली । स्वामींची मूर्ती ठेवली । नेऊन, समाधीच्या जागेवरी ।।९।।

 

रुद्राभिषेक झाला । पंचोपचार विधी झाला । गजर गजानन नामाचा केला। शोकाकुल भक्तांनी ।।१०।।

 

मीठ अर्गजा अबीर । यांनी ती भरली गार । शिळा लावूनी

केले द्वार । बंद, शेवटी हो ।। ११।।

 

भक्त, लोक येती मठाला । स्वामींच्या प्रसादाला । वंदन करिती स्वामी समाधीला । भक्तिभावाने ।।१२ ।।

********

।। इति अध्याय -१९ ।।

*****************************

अध्याय २० वा आता होईल सुरू..

करी क्रमशः हे लेखन कवी अरुणदास

___________________________

कवी अरुणदास ” अरुण वि.देशपांडे – पुणे.

——————————————

प्रतिक्रिया व्यक्त करा