जिल्ह्यातील ४३ हजार बागायतदारांना फळपीक विम्याचे वाटप…
सिंधुदुर्गनगरी
पुनर्रचित हवामानावर आधारित फळपीक विमा योजना अंतर्गत विमा नुकसान भरपाई वितरणाचा कार्यक्रम दिनांक १६ ऑक्टोबरला सकाळी ११ वाजता जिल्हाधिकारी कार्यालयाच्या कॉन्फरन्स हॉलमध्ये आयोजित करण्यात आला आहे.
या कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान पालकमंत्री नितेश राणे भूषवणार असून ते दूरदृश्य प्रणालीद्वारे उपस्थित राहणार आहेत.
या योजनेत जिल्ह्यातील ४३ हजार २१९ आंबा आणि काजू बागायतदार शेतकऱ्यांनी एकूण १७,५७७ हेक्टर क्षेत्राचे विमा संरक्षण घेतले आहे. या सर्व शेतकऱ्यांना नुकसान भरपाई वितरित केली जाणार आहे.
मंत्रालय स्तरावर झालेल्या बैठकीनुसार शेतकऱ्यांना दिवाळीपूर्वी विमा नुकसान भरपाई अदा करण्याचे निर्देश भारतीय कृषी विमा कंपनीला देण्यात आले होते. त्यानुसार कृषी विभागामार्फत या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे.
