*जागतिक साहित्य कला व्यक्तित्व विकास मंचचे सन्मा सदस्य ज्येष्ठ कवी अरुण वि देशपांडे लिखित अप्रतिम काव्यरचना*
।।गण गण गणात बोते ।। जय गजानन श्री गजानन ।।
__________________________
श्री गजानन विजय काव्यांजली काव्यपुष्प -११३ वे ,
अध्याय – १९ वा ,कविता- ५ वी.
___________________________
स्वामींनी बाळास जे सांगितले । ते ज्ञान सर्वांनी पाहिजे जाणले । कळेल मर्म त्यातले । भक्त-जनांना ।। १।।
ज्ञानाच्या गावाकडे । जाण्याचे ईश्वराकडे । असे मार्ग कोणते ?हेच कोडे । उलगडून सांगितले स्वामींनी ।।२ ।।
सोवळे ओवळे संध्यास्नान । व्रत,उपोषणे, अनुष्ठान ।
असे ज्यात आचरण । स्वरूप हे कर्माचे ।।३ ।।
कर्माचे आचरण । नसे सोपे, आहे ते कठीण ।असता यात न्यून । मार्ग कर्माचा ना गवसे ।। ४ ।।
मार्ग भक्तीचा । शुद्ध मनाचा ।जो असे मालिन मनाचा ।
त्याच्या हाती काही ना लागे ।। ५ ।।
दया,प्रेम,ज्याचे अंतःकरण । करी नित्य हरी-नामस्मरण ।
आस्थेने करितो पूजन श्रवण । भेटेल त्यास श्री हरी ।।६।।
एक घ्यावे समजून । भक्ती मार्ग असे कठीण । कर्ममार्गाहून। आहे अवघड आचरण । भक्तिमार्गाचे हो ।।७।।
मार्ग आहे जो तिसरा । मोठा योगमार्गाचा पसारा । समजून घ्यावा सारा । असे जो प्रत्येकांजवळी ।।८ ।।
जे आहे ब्रह्मांडात । तेच असे पिंडात । लागते साहित्य जे योगात ।आसने, रेचक, कुंभासाठी ।।९।।
कुंडली आणि सुषुम्ना । माहिती असावी साधकांना । करण्या योगासना । तरच जमेल योगसाधना ।। १० ।।
**********
करी क्रमशः हे लेखन कवी अरुणदास
__________________________
कवी अरुणदास ” अरुण वि.देशपांडे – पुणे.
___________________________
