*जागतिक साहित्य कला व्यक्तित्व विकास मंचचे सन्मा सदस्य ज्येष्ठ लेखक कवी श्री अरुण वि देशपांडे लिखित अप्रतिम काव्यरचना*
।। श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ ।।
___________________________
श्री स्वामी समर्थ काव्य वंदना काव्यपुष्प – ३४ वे
श्री स्वामी भ्रमण गाथा…(अंबाजोगाई- महाराष्ट्र)
___________________________
सावकाराचे वऱ्हाड परतले । घरात सारे आनंदले । एक दिवस सारेच आले । स्वामी आजोबांच्या दर्शना ।।१।।
स्वामींनी वराला बोलाविले । त्यास कल्याण आशीर्वाद दिले। आचरण तू,शास्त्रानुसार पाहिजे ठेवले । पुढे प्रज्ञापुरी भेटीस यावे ।। २ ।।
काही दिवसांनी एक घडले । त्या सावकारपुत्रास स्मरण झाले । आता पाहिजे गेले । अक्कलकोटी स्वामींच्या दर्शना ।।३।।
तू आचरण आज्ञेचे पालन केले । मग इकडे येणे केले ।
हे योग्य झाले । आता परमार्थ मार्ग करावा संपादन ।।४।।
या साऱ्या कथेचा सार । मुलीचा मुलगा होणे,चमत्कार ।
वाटेल असे वारंवार । परी हे असे योग-सामर्थ्य ब्रह्मान्ड-नायकाचे ।।५ ।।
भ्रमणगाथा सुरूच आहे । पुढील प्रवासासाठी जाणे आहे। कार्य प्रबोधनाचे करणे आहे । स्वामी निघाले,दक्षिण भारताकडे ।।६ ।।
*****************
करी क्रमशः हे लेखन कवी अरुणदास
___________________________
कवी अरुणदास ” अरुण वि.देशपांडे-पुणे.
___________________________
