You are currently viewing कलमठमधील वीज पुरवठा सुरळीत न केल्यास १५ ऑगस्टला उपोषण…

कलमठमधील वीज पुरवठा सुरळीत न केल्यास १५ ऑगस्टला उपोषण…

कलमठमधील वीज पुरवठा सुरळीत न केल्यास १५ ऑगस्टला उपोषण…

शिवसेना ठाकरे पक्ष पदाधिकाऱ्यांचा इशारा; महावितरण अधिकाऱ्यांना दिले निवेदन..

कणकवली

कलमठ गावासाठी स्वतंत्र फिडर द्यावा, तसेच कलमठ गावात वारंवार वीज पुरवठा खंडित होतो. हा वीज पुरवठा सुरळीत न झाल्‍यास १५ ऑगस्टला उपोषण करणार असल्‍याचा इशारा शिवसेना ठाकरे पक्षाच्या कलमठ गावातील पदाधिकाऱ्यांनी आज दिला. याबाबतचे निवेदन महावितरणच्या अभियंत्‍यांना देण्यात आले.

निवेदनात म्‍हटले आहे की, कलमठ गावच्या वीज समस्येबाबत आपल्या विभागाकडे वारंवार आवाज उठविलेला आहे. कलमठ गावचे शहरीकरण झाले आहे तरीही गावात विजेच्या समस्या दिवसेंदिवस वाढत चालले आहेत. दिवसाआड लाईट ये-जा चालू असते. कलमठ गावातील ग्रामस्थांना होणाऱ्या त्रासाबद्दल १५ ऑगस्टला सकाळी ७ वाजता कणकवली येथील महावितरण कार्यालयासमोर उपोषण केले जाणार आहे.


कलमठ गाव हे खारेपाटण फिडरला जोडलेले असल्यामुळे या फिडरवरील कुठल्याही गावात प्रॉब्लेम झाल्यास कलमठ मधील विजेवर याचा सतत परिणाम होत असतो. त्यामुळे खारेपाटण फिडरचे दोन भाग करुन कलमठ फिडर वेगळा केल्यास दोन्ही फिडरला सोयीचे होईल. त्यामुळे या गोष्टीवर विचार करुन लवकरात लवकर कार्यवाही करावी अशी मागणी या निवेदनात केली आहे.

यावळी शिवसेनना ठाकरे पक्षाचे शिवसेना तालुका संघटक राजू राठोड, उपतालुका प्रमुख जितेंद्र कांबळे, विलास गुडेकर, आशिष मेस्त्री,अविराज खांडेकर, सचिन पवार, आदित्य पालव आदी सह ग्रामस्थ उपस्थित होते.

प्रतिक्रिया व्यक्त करा