You are currently viewing श्री गजानन विजय काव्यांजली काव्यपुष्प – १०८ वे

श्री गजानन विजय काव्यांजली काव्यपुष्प – १०८ वे

*जागतिक साहित्य कला व्यक्तित्व विकास मंचचे सन्मा सदस्या ज्येष्ठ लेखक कवी अरुण वि. देशपांडे लिखित अप्रतिम काव्यरचना*

 

।। गण गण गणात बोते ।। जय गजानन श्री गजानन ।।

___________________________

श्री गजानन विजय काव्यांजली काव्यपुष्प – १०८ वे

अध्याय- १८ वा, कविता- ६ वी

___________________________

 

बाकी मंडळींनी हेतू मनीचा बोलला । जसा विठ्ठल दाविला ।

स्वामी तुम्ही बापुनाला । तसे घडवा दर्शन आम्हाला ।। १।।

 

गजानन महाराज म्हणाले । तुम्ही करा मन निर्मळ आपुले ।

असे जर झाले । घडवीन दर्शन तुम्हाला ।। २।।

 

याच सुमाराला । पंढरपूर क्षेत्राला । मरी आली मुक्कामाला । एकच कहर सगळीकडे ।। ३ ।।

 

डॉक्टरांनी आदेश दिला । तिथल्या पोलीसदला । नेऊन सोडावे वारकऱ्याला । चंद्रभागेच्या पार ।। ४ ।।

 

एक वारकरी वऱ्हाडचा । तो सापडला यात साचा ।कुणी ना केला विचार याचा । एकटा पडला बिचारा ।।५ ।।

 

सद्गुरू गजाननांची कृपा झाली । वारकऱ्याची व्याधी बरी झाली । मंडळी सारी आली । सुखरूप कुर्डुवाडीवर ।।६।।

 

एक कर्मठ ब्राहमण शेगावी आला । श्री गजानन दर्शनाला ।

नाही सोवळे-ओवळे, पाहून खट्टू झाला । उगाच आलो मनी म्हणाला। या ईथे।।७।।

 

रस्त्यात कुत्रे मृत झालेले । स्वामींनी त्यास उठविले । कुत्रे निघून गेले । ब्राह्मणास ,स्वामी सामर्थ्य कळले। क्षणात हो।।८।।

 

निरुत्तर तो झाला । स्वामींना शरण गेला । क्षमा करा स्वामी मला । चरण वंदून निघून गेला ।।९।।

 

स्वामींनी भला । भक्तांना संदेश दिला । भाव पाहिजे ठेवला।

श्री भगवंत चरणी ।।१० ।।

**********

इति अध्याय-१८ वा..

_____________

अध्याय १९ वा सुरू इथून पुढे..करी क्रमशः हे लेखन

कवी अरुणदास

___________________________

कवी अरुणदास ” अरुण वि.देशपांडे-पुणे

____________________________

प्रतिक्रिया व्यक्त करा