*जागतिक साहित्य कला व्यक्तित्व विकास मंचचे सन्मा सदस्य कवी अरुण वि देशपांडे लिखित अप्रतिम काव्यरचना*
।। श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ ।।
_____________________
श्री स्वामी समर्थ काव्यवंदना काव्यपुष्प-३३ वे
श्री स्वामी भ्रमणगाथा..(अंबाजोगाई-महाराष्ट्र)
___________________________
गुराखी-कन्या भयभीत झाली । आपला शिरच्छेद होणार,
खात्री तिची झाली । ती मारेकऱ्यांना म्हणाली । माझ्या संन्यासी- आजोबांचा निरोप घेऊ द्या ।। १ ।।
नातीचे बोलणे स्वामी आजोबांनी ऐकले । तुझा वध होणे शक्य नाही । भिऊ नकोस मी पाठीशी आहे । त्यांचे हे शब्द मारेकऱ्यांनीही ऐकले ।। २ ।।
नृसिंह-उग्र रुपात स्वामींना पाहिले । मारेकरी ते घाबरले ।
गावात जाण्या निघाले । सावकाराला घेऊन येण्या ।।३।।
तिथे आलेल्या सावकाराला। आणि सोबतच्या मंडळीला।
चमत्कार विलक्षण दिसला। मुली ऐवजी मुलगा दिसला ।।४।।
आपल्या भक्तांचा जीव वाचविला। मुलीचा मुलगा झाला।
सर्वांना प्रत्यय आला । ब्रह्मांडनायकाच्या सामर्थ्याचा ।।५।।
स्वामींच्या कृपेने पुढचे कार्य पार पडले । वरास स्वामी म्हणाले । शास्त्रानुसार तू पाहिजे वागले । मग भेटीस यावेस तू प्रज्ञापुरी ।। ६ ।।
स्वामी अंतर्धान पावले । जन जमलेले । गावात परतले ।
मनात आठवीती स्वामींना ।।६ ।।
*********************************
करी क्रमशः हे लेखन कवी अरुणदास
___________________________
कवी अरुणदास ‘- अरुण वि.देशपांडे-पुणे.
___________________________

