*जागतिक साहित्य कला व्यक्तित्व विकास मंचचे सन्मा सदस्य कवी अरुण वि देशपांडे लिखित अप्रतिम काव्यरचना*
।।श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ ।।
————————————–
श्री स्वामी समर्थ नाम । आहे पावन हो नाम । नित्य घ्यावे
नाम । मिळे समाधान ।। १ ।।
हरीचा आठव अंतरी । जो नित्य करी । स्मरण श्री गुरूंचे करी । भक्त असती प्रिय समर्थांसी ।। २ ।।
भ्रमाणगाथा समर्थांची । शब्दरूपात साची । महती समर्थ कार्याची घ्यावी जाणुनी ।।३ ।।
गुजरात, सौराष्ट्र, कच्छ भागातले एक क्षेत्र । असे एक त्रिविक्रम देवालय क्षेत्र । नारायण तलाव पवित्र ।
ख्यात असे सर्वत्र ।। ४ ।।
प्रमुख इथला महंत होता । ताफा शिष्यांचा मोठा हा महंत
बाळगून होता । पैसे बळजबरीने वसुली करता । यात्रेकरूकडून ।।५ ।।
महंताचा असा अन्यायी कारभार । यात्रेकरूंना होई त्रास फार । महंतांचे वागणे भयंकर । यात्रेकरूंच्या सोबत ।।६।।
त्रिकालज्ञानी स्वामींना हे सारे लक्षात आले । त्यांचे येणे
या क्षेत्री झाले । नारायण तलावाकाठी आले । श्री स्वामी समर्थ ।।७ ।।
मध्यभागी तलावाच्या गेले । जलपृष्ठावरी जाऊन बसले ।
महंत शिष्यांना योग सामर्थ्य दाविले । थक्क झालेल्या
शिष्याने महंतास वृत्त सांगितले ।।८ ।।
महंत त्वरे स्वामी दर्शना आला ।म्हणे, आलो मी शरण तुम्हाला । आम्ही छळ सर्वांचा केला। घोर अपराध आम्ही केला ।।९ ।।
महंत आता बदलला । स्वामींना प्रत्यय आला । न्याय नीती
शुद्ध आचरणाचा धडा त्यासी दिला । स्वामींनी ।।१० ।।
************
करी क्रमशः हे लेखन कवी अरुणदास
—————————————-
कवी-अरुणदास -अरुण वि.देशपांडे-पुणे
—————————————–
