*जागतिक साहित्य कला व्यक्तित्व विकास मंचचे सन्मा सदस्य कवी अरुण वि देशपांडे लिखित अप्रतिम काव्यरचना*
।। गण गण गणात बोते । जय गजानन श्री गजानन ।।
__________________________
श्री गजानन विजय काव्यांजली काव्यपुष्प- १०० वे
अध्याय – १७ वा , कविता – ४ थी ।।
___________________________
श्री गजाननाच्या बोलण्यावर । जठार करिती विचार ।
स्वामींचे मुक्त-जीवन नि विचार । शिष्य त्यांचे देत नाहीत नीट लक्ष स्वामींकडे ।। १ ।
भास्कर शिष्याने लक्ष नाही दिले । म्हणून हे सारे घडले ।
जबाबदार भास्करास धरले । जठार साहेबांनी ।। २।।
दंड ठोठावला भास्कराला । स्वामी म्हणाले मग त्याला ।
अतिआग्रह तुला नडला । नको वागू असे यापुढे ।। ३ ।।
एकदा असेच स्वामी अकोल्याला आले । बापुराव शिष्याच्या
घरी उतरले । बापूरावाने माणुस पाठवून कळवलें ।
महताबशा साधूला ।। ४ ।।
मिरवणूक निघाली। छान मिरवून आली। भोजनास यावे
स्वामी ,विनंती केली । बापूरावाने ।। ५ । ।
साधुस नाही बोलावले । म्हणून स्वामी भोजना ना आले।
शेवटी साधुलाही बोलावले । स्वामींच्या सोबत भोजनास ।।६।।
स्वामींना राममंदिरी उतरवले। मेहताब साधूला जवळील
थेटरात पाठवले । शेवटी स्वामी ही तिकडेच गेले। साधुस
भेटण्याला ।। ७।।
*****************
करी क्रमशः हे लेखन कवी- अरुणदास
___________________________
कवी- अरुणदास – अरुण वि.देशपांडे- पुणे.
___________________________

